मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीना जाऊन मिठी मारणाऱ्या आदित्य ठाकरेंचं शुद्धीकरण नक्की कसं करणार? असा सवाल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी विचारला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजली देऊन राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याबद्दल युवराजांना या पापातून मुक्त करण्यासाठी गोमूत्राने अंघोळच घालावी लागेल असा टोला म्हात्रे यांनी लगावला आहे.
तर @AUThackeray यांना गोमूत्राने अंघोळ घालून शुध्द करावे लागेल… pic.twitter.com/fqEFOH1rR8
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) November 16, 2022
स्वर्गीय शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी स्मृती स्थळावर जाऊन बाळासाहेबांच्या समधीस्थळाचे दर्शन घेतले होते. मात्र यानंतर काही वेळात येऊन शिल्लक सेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन गोमूत्र शिंपडून ते समधीस्थळाचे शुद्धीकरण करण्याचा बालिशपणा केला, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.
Projects depend on the competency of the CM and the industries minister. Both, focussing only on dirty politics, Maharashtra has lost out on 5 projects in 3 months.
Monstrous ambitions for oneself and zero ambition for Maharashtra’s economic development in past 3 months.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 12, 2022
आयुष्यभर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आपले स्फुर्तीस्थान मानणाऱ्या आणि त्यांचा अपमान करणारे काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांना अद्दल घडवण्यासाठी जोडे मारो आंदोलन करणाऱ्या बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे यांनी ज्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेत जाऊन मिठी मारली, त्याच राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जाहीर अपमान केला आहे. त्यामुळे या पापातून मुक्त होण्यासाठी नक्की आपलं शुद्धीकरण आदित्य ठाकरे नक्की कसं करून घेणार? असा बोचरा सवाल शीतल म्हात्रे यांनी शिल्लक सेनेच्या कार्यकर्त्यांना विचारला आहे