घरमहाराष्ट्रजेवण न दिल्याने आईची केली हत्या, सांगलीतील घटनेने खळबळ

जेवण न दिल्याने आईची केली हत्या, सांगलीतील घटनेने खळबळ

Subscribe

कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथील पाटील मळ्यात दशरथ आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याला दारुचे व्यसन होते. अनेकदा दशरथ दारुच्या नशेत आईशी भांडण करून तिला मारहाणही करायचा.

जेवन न दिल्याच्या रागातून आपल्या जन्मदात्री आईलाच संपवल्याची घटना सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे घडली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. दशरथ जाधव असे या आरोपीचे नाव आहे.

राजाक्का ज्ञानू जाधव (७०) असे या दुर्दैवी आईचे नाव आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथील पाटील मळ्यात दशरथ आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याला दारुचे व्यसन होते. अनेकदा दशरथ दारुच्या नशेत आईशी भांडण करून तिला मारहाणही करायचा. घटनेच्या दिवशी राजाक्का यांनी दशरथला जेवण दिले नव्हते. त्यामुळे राग अनावर न झाल्याने दशरथने  आईला दगड, विट आणि लोखंडी फुकणीनं अमानुष मारहाण केली. या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मृत महिलेचा नातू गणेश भोसले यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी  गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. पोलीस दशरथची कसून चौकशी करत आहेत.  पोटच्या मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -