घर महाराष्ट्र नागपूर "लवकर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचे मनपरिवर्तन होऊन...", चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे विधान

“लवकर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचे मनपरिवर्तन होऊन…”, चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे विधान

Subscribe

शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघे आगामी काळात भाजपसोत सत्तेत येतील, असे वक्तव्य भाजप मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी देखील केली.

अमरावती : थोड्या दिवसांनंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे देखील भाजपला पाठिंबा देतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. अमरावतीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले. ‘अजित पवार हे आमचे नेते आहेत. भाजपसोबत ते गेले म्हणून पक्षात फूट पडली, असे होत नाहीट, असे मोठे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार यांच्या विधानामुळे राजयकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंना प्रश्नविचारल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “मोदींच्या नेतृत्वात विश्वकर्मा योजना, ओबीसी घटकांकरता योजना यासारख्या असंख्य योजनांवर काम सुरू आहे. गेल्या नऊ वर्षात केंद्र सरकारला जे निर्णय घेता आले नाही, ते निर्णय या वर्षात घेऊ आणि केंद्र सरकारचे हेच काम पाहून शरद पवारचे लवकर मनपरिवर्तन होईल, यानंतर अजित पवार यांच्याप्रमाणे शरद पवार आणि सुप्रिया सुळे मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा देतील.”

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar : “अजित पवार आमचेच नेते…,” सुप्रिया सुळेंपाठोपाठ शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ

आज भाजपसोबत जाणार नाही म्हटले, तरी…

शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघे आगामी काळात भाजपसोत सत्तेत येतील, असे वक्तव्य भाजप मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी देखील केली. यावेळी केशव उपाध्ये म्हणाले, “शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे मनपरिवर्तन लवकरच होणार असल्याची खात्री असून देशाचा विकास हे फक्त मोदीच करू शकतात. पण शरद पवार आज म्हणत असतील की, भाजपसोबत जाणार नाही. आगामी काळात शरद पवार हे भाजपसोबत जाणार आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – जे घरात बसून WHOला सल्ला देऊ शकतात…, बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

शरद पवार नेमके काय म्हणाले

शरद पवार म्हणाले, “अजित पवार हे आमचे आहेत, यात काही वाद नाही. पक्षात फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते. जेव्हा पक्षामधून मोठा वर्ग वेगळा झाला, अशी स्थिती आमच्या पक्षात नाही. काही लोकांनी पक्ष सोडला, वेगळी भूमिका घेतली आणि हा लोकशाहीचा अधिकार आहे. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली म्हणून पक्षात फूट पडली, असे म्हणायचे कारण नाही.”

- Advertisment -