दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला.निकाल म्हटला की अनेक विद्यार्थी हे तणावाखाली असतात. अनेकांना यश मिळते तर काहींच्या नशिबी अपयश येते. परंतु,काही जण निकालाच्या भितीनेच आपले जीवन संपवतात. अशीच एक दुर्दैवी घटना कोल्हापुरात समोर आली आहे. इंग्रजी विषयात नापास होण्याच्या भीतीने प्रणव जगर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. परंतु, आत्महत्या करणारा प्रणव जरग ४२% टक्के गुण मिळवून दहावी उत्तीर्ण झाला आहे. प्रणव उत्तीर्ण झाल्याची माहिती त्याच्या मित्रपरिवाराने कुटुंबीयांना दिली.
नापास होण्याच्या भीतीने प्रणव सुनील जरग (वय १६, रा. आर. के. नगर सोसायटी, नंबर ५) या विद्यार्थाने गळफास लावून गुरुवारी (ता. ६ ) आत्महत्या केली होती. आज दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यावर त्याला दहावीत ४२ टक्के गुण मिळाल्याचे समजले. अवघड वाटत असलेल्या इंग्रजी विषयात ३७ गुण मिळाले आहेत. गुरुवारी सायंकाळी मुलांसोबत खेळून आलेल्या प्रणवने आईबाबांसोबत बाहेर जाण्यास नकार देऊन घरीच राहणे पसंत केले. घरातील दिवे मालवून त्याने ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्याचे काका बाजीराव घरी परतल्यावर या गोष्टीचा उलगडा झाला. आत्महत्या करण्यापूर्वी मी इंग्रजी नापास होणार असल्याची भीती त्याने घरी बोलून दाखविली होती. मात्र पालकांनी ‘कितीही गुण मिळू देत, काळजी करु नको’, असे सांगितले होते.