घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयावर दगडफेक

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयावर दगडफेक

Subscribe

अहमदनगर : राहुरी शहराजवळ असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयावर रविवारी (दि.३१) पहाटे २ ते ३ च्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या एका संतप्त गटाने कुलगुरू कार्यालयात आसरा घेतलेल्या दुसर्‍या गटावर दगडफेक केली. विद्यापीठाच्या दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने खळबळ उडाली आहे.

कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठात राज्यभरातून व देशातून विद्यार्थ्यांची ऑनलाईन निवड केली जाते. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली, त्यांच्याकडून 70 हजार रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. या विद्यापीठात एकूण 168 प्रवेशांची मर्यादा आहे. परंतु, या विद्यापीठाच्या होस्टेलमध्ये जवळपास 500 विद्यार्थी अनधिकृतपणे वास्तव्यास असून, त्यांच्याकडून कुठलीही होस्टेल किंवा मेस फी आकारली जात नाही.

- Advertisement -

त्यामुळे अधिकृत आणि अनधिकृत विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. त्याचे पर्यवसान संघर्षात झाले. अधिकृत विद्यार्थ्यांपेक्षा अनधिकृत विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी होस्टेलजवळ असलेल्या कुलगुरू कार्यालयात धाव घेत आसरा घेतला. या विद्यार्थ्यांना मारण्यासाठी अनधिकृत 500 विद्यार्थ्यांच्या गटाने कुलगुरू कार्यालयावर जोरदार दगडफेक करीत हल्ला केला. परंतु, कार्यालयाबाहेर कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखत हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. प्रहार जनशक्ती पक्षाचे आप्पासाहेब ढूस यांनी घडलेल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ढूस म्हणाले, काही विद्यार्थ्यांनी कुलगुरु कार्यालयात असलेल्या सुरक्षा रक्षक शेटे यांच्या केबिनमध्ये आसरा घेतला होता. हे विद्यार्थी खूप घाबरलेले होते व जीव वाचवण्यासाठी धावा करत होते. आमच्या हत्या झाल्या तर त्याला जबाबदार कोण अशी विचारणा करत होते. आम्ही फी भरून परीक्षा देऊन आलो तरी आम्हाला असे चोरासारखे लपून बसावे लागते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -