जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) काही बुरखा घातलेल्या तरुणांनी रविवारी रात्री हल्ला केला. या हल्ल्यात जेएनयु विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आयशे घोष यांच्यासह अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा मुंबई,पुण्यासह देशाच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया तर पुण्यात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत निषेध व्यक्त केला.
Gateway to India Mumbai today morning 1am of 6th Jan 2020 ,reached protest thr in solidarity for What happened in JNU campus delhi. pic.twitter.com/0mzOFITwip
— Raja Rahebar Khan (@RahebarRaja) January 5, 2020
मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकवटले. कँडल मार्च काढत विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला. तर जेएनयुच्या विद्यार्थांवर हल्ला झाल्यानंतर मध्यरात्री पुण्यात एफटीआयचे तरूण एकवटले. मध्यरात्रीची वेळ असूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या मार्चमध्ये सहभागी झाले होते. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी हल्ल्याचा संशय असेलेल्या अभाविप विरोधात घोषणा देण्यात आल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. तर मुंबईत आज संध्याकाळी हुतात्मा चौकात या हल्ल्याचा निषेध करण्यात येणार आहे. तर पुण्यात संध्याकाळी ७ वाजता गुडलक चौकात अभाविपचा निषेध करण्यात येणार आहे. न्या. बी. जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सभा होईल.
Seriously? Hinduon se Azadi? It's the high time we should book Boeing 737 to Pakistan for them. #ShutDownJNU pic.twitter.com/gF9iYqJLgP
— AYUSH VERMA (@AYUSHVERMA33) January 6, 2020
कँपसमध्ये तणाव कायम
सध्या देशभरातून जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. तर विद्यापीठाच्या कँम्पसमध्ये तणावाचे वातावरण आहे. रात्रभर कॅम्पस,एम्स तसेच पोलीस मुख्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी एम्समध्येच धरणे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान, जेएनयू कॅम्पसमध्ये पोलिसांनी रात्री फ्लॅग मार्च केला.
ट्विटरवरून व्यक्त केला निषेध
परराष्ट्रमंत्री एस.शंकर आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जेएनयूतील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. हिंसाचाराची जी दृष्ये समोर आली आहेत ती भीतीदायक आहेत. विद्यापीठात अशा घटनेला थारा असता नये. विद्यार्थ्यांसाठी हे ठिकाण अधिक सुरक्षित असण्याची गरज आहे, असे सीतारामन यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Union Home Minister has spoken to Delhi Police Commissioner over JNU violence and instructed him to take necessary action. Hon’ble minister has also ordered an enquiry to be carried out by a Joint CP level officer and asked for a report to be submitted as soon as possible.
— गृहमंत्री कार्यालय, HMO India (@HMOIndia) January 5, 2020
Horrifying images from JNU — the place I know & remember was one for fierce debates & opinions but never violence. I unequivocally condemn the events of today. This govt, regardless of what has been said the past few weeks, wants universities to be safe spaces for all students.
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) January 5, 2020