घरताज्या घडामोडीहा आंधळी कोशिंबीरचा खेळ, बंडखोरी सत्यासाठी नव्हे तर सत्तेसाठी ; सुषमा अंधारेंचा...

हा आंधळी कोशिंबीरचा खेळ, बंडखोरी सत्यासाठी नव्हे तर सत्तेसाठी ; सुषमा अंधारेंचा घणाघात

Subscribe

अमरावतीचे आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात सुरू असलेल्या गुहावाटी वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राणांनी केलेल्या आरोपांनंतर बच्चू कडूंनी पुरावे मागितले होते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत दोन्ही आमदारांमधील वाद मिटवला. त्यानंतर रवी राणांनी आरोप मागे घेत दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान हा आंधळी कोशिंबीरचा खेळ असून बंडखोरी सत्यासाठी नव्हे तर सत्तेसाठी झाली, असा घणाघात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, एकीकडे एकनाथ शिंदेंच्या बंडाशी संबंध नाही असे म्हणायचे आणि दुसरीकडे मीच बच्चू कडू यांना गुवाहाटीला पाठवले असे म्हणायचे. हा म्हणजे आंधळी कोशिंबीरचा खेळ आहे. भाजपच्या सांगण्यावरून गेलेल्या आमदारांना हिंदुत्वच कळलं नाही. त्यांचं हिंदुत्व देवेंद्र फडणवीस यांनी जागं केलं. बंडखोरी ही सत्यासाठी नव्हे तर सत्तेसाठी झाली, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

- Advertisement -

बच्चू कडू हे माझ्या एका फोनवर गुवाहाटीला गेले होते. मी त्यांना फोन केला, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे भाजप नेते म्हणत होते. मात्र, ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत ठराव सिद्ध केला तेव्हा ते सगळं महाशक्तीच्या कृपेने झालं, असं अंधारे म्हणाल्या.


हेही वाचा : इंग्लंडचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -