घरCORONA UPDATEराज्य सरकारची चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना NDRF पेक्षाही अधिक मदत - अजित पवार

राज्य सरकारची चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना NDRF पेक्षाही अधिक मदत – अजित पवार

Subscribe

निसर्ग चक्रीवादळाने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी अनेक घोषणा केल्या. अजित पवार म्हणाले की, राज्य सरकारने NDRF पेक्षाही पुढे जाऊन अधिकची मदत कोकणवासीयांना दिली आहे. तसेच कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे आलेल्या महापुरानंतर ज्या नुकसानग्रस्तांना मदतीचे पैसे देण्याचे राहिले होते, त्यांना देखील मदत देण्याच्या तातडीच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगितले.

एनडीआरएफने प्रत्येक कुटुंबाला कपड्यांसाठी आणि भांडी घेण्यासाठी प्रत्येकी अडीच हजार रुपये दिले जात होते. मात्र, राज्य सरकारने यासाठी आता प्रत्येकी ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. अंशतः पडझड झालेल्या घरांना १५ हजार रुपये, झोडप्यांसाठी ६ हजार रुपये दिले जात होते, आपण १५ हजार रुपये देणार आहोत. स्थानिक दुकानदारांना १० हजार रुपयांपर्यंत मदत किंवा ७५ टक्क्यांपर्यंत भरपाई दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच फळबागांसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी १८ हजार रुपये दिले जायचे, आपण हेक्टरी ५० हजार रुपये मदत देणार आहोत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य ती मदत दिली जात आहे.

- Advertisement -

एनडीआरएफने जाहीर केलेल्या मदतीच्या पुढे जाऊन राज्य सरकार मदत करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एवढेच नाही तर वादळाचा फटका बसलेल्या भागात वादळाने वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. ही यंत्रणा दुरुस्त करुन वीज येण्यासाठी पुढील १५ दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात प्रत्येक रेशनकार्ड धारकाला मोफत लिटर रॉकेल दिले जाईल. तसेच तेथे प्रमुख आहार तांदूळ असल्याने त्यांना तांदूळही दिले जातील, असेही अजित पवार यांनी यावेळी म्हणालेत.

पूरग्रस्तांच्या थकीत रकमाही तात्काळ देणार

गेल्यावर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुरात अनेकांचे संसार उध्वस्त झाले होते. मात्र या भागातील काही नुकसानग्रस्तांना अद्यापही आर्थिक मदत मिळाली नसल्याच्या तक्रारींचाही आहेत. त्यामुळे ज्या नुकसानग्रस्ताचे पुराच्या नुकसानीचे पैसे देणे बाकी आहेत त्यांना तात्काळ पैसे दिले जातील. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत सुचना केल्या आहेत. यावर कॅबिनेटमध्येही निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

कोकणवासीयांना त्यांच्या हक्काचे स्लॅबचे पक्के घर देण्याचा विचार

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात रायगड, रत्नागिरी आणि काही प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकसान झाले असून, कोकणवासीयांना पुन्हा वादळाचा फटका बसू नये म्हणून पक्की स्लॅबची घरे देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. पावसाळी आधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सल्लागार समितीची बैठक विधान भवनात आयोजित करण्यात आली होती या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिली.

मुंबई वाचली, मात्र कोकणात चक्रीवादळाने कोकणाला मोठा फटका बसला. त्यात कोकणातील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. ही चक्रीवादळे येत राहणार आहेत. त्यामुळे या नुकसानग्रस्तांना वादळाचा तडाखा बसू नये म्हणून हक्काचे पक्क स्लॅबचं घर दिलं जाईल असे अजित पवार यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -