घरताज्या घडामोडीमी तुम्हाला तिळगूळ देते, गोड बोलायला सुरुवात करा; राणांचा ठाकरेंना टोला

मी तुम्हाला तिळगूळ देते, गोड बोलायला सुरुवात करा; राणांचा ठाकरेंना टोला

Subscribe

उद्दव ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे या तिघांसाठी मी स्पेशली तिळगुळ पाठवते. आत्ता तरी खोटं बोलणं सोडा, तिखट बोलणं सोडा. माझ्याकडून आणि महाराष्ट्राच्या जनतेकडून मी तुम्हाला तिळगुळ देते आणि गोड गोड बोलायची सुरुवात करा अशा शुभेच्छा तुम्हाला देते, अशा शब्दांत अमरावतीच्या खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

उद्दव ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे या तिघांसाठी मी स्पेशली तिळगूळ पाठवते. आत्ता तरी खोटं बोलणं सोडा, तिखट बोलणं सोडा. माझ्याकडून आणि महाराष्ट्राच्या जनतेकडून मी तुम्हाला तिळगूळ देते आणि गोड गोड बोलायची सुरुवात करा अशा शुभेच्छा तुम्हाला देते, अशा शब्दांत अमरावतीच्या खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच, खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावरही हल्लाबोल केला. (Thackeray Group Shiv Sena Chief Uddhav Thackeray Navneet Rana)

खासदार नवनीत राणा यांनी एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर हल्लाबोल केला. “महाराष्ट्रातील जनतेला मी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतेय. तसेच, काही अशी नावे आहेत, ज्यांना मी विशेष तिळगूळ पाठवणार आहे. कारण जेव्हाही ते बोलतात तेव्हा खोटं बोलतात, कडू बोलतात आणि तिखट बोलतात. उद्दव ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे या तिघांसाठी मी स्पेशली तिळगूळ पाठवते. आत्ता तरी खोटं बोलणं सोडा, तिखट बोलणं सोडा. माझ्याकडून आणि महाराष्ट्राच्या जनतेकडून मी तुम्हाला तिळगुळ देते आणि गोड गोड बोलायची सुरुवात करा, अशा शुभेच्छा तुम्हाला देते”, अशा शब्दांत नवनीत राणा यांनी शिवसेना नेत्यांवर हल्लाबोल केला.

- Advertisement -

विशेष म्हणजे या कार्यक्रमात भाषण करताना खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. “उद्धव ठाकरे यांच्या काळात फेसबुक लाइव्हवर सरकार अडीच वर्ष चालले. हनुमान चालीसा वाचली म्हणून एका लोकप्रतिनिधीला १३ दिवस या उद्धव ठाकरेंनी तुरुंगात टाकले. बाळासाहेबांचे विचारच त्यांनी घरात ठेवले नाहीत मग यांचं काय होईल?”, अशी टीका केली.

त्याशिवाय, धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार यावरही नवनीत राणा यांनी भाष्य केले. “बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे एकनाथ शिंदे यांनाच धनुष्यबाण मिळेल असा माझा विश्वास आहे”, असे राणा यांनी म्हटले. तसेच, जे बाळासाहेबांचे विचार घरात ठेवू शकले नाहीत ते सत्तासाठी काय संघर्ष करणार? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

- Advertisement -

नवनीत राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले होते. मुंबईतील मातोश्रीबाहेर जाऊन आपण हनुमान चालिसा म्हणण्याचा चंगच त्यांनी बांधला होता. तेव्हापासून शिवसेना आणि राणा यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.


हेही वाचा – …तर मी पहिली पदवीधर महिला आमदार असेन; शुभांगी पाटील यांचा दावा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -