कोल्हापूर – शहरासह जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून हलक्या सरींनी हजरी लावली. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पावासामुळे हजेरी लावल्याने रात्री साडे आठच्या सुमारास राधानगरी धरनाच्या स्वयंचलित 6 व्या दरवाजा उघडला . राधानगरी धरणातून एकूण 3 हजार 28 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पातळी १८ फूट 11 इंचापर्यंत खाली आली आहे. तर जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा तालुके सोडून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पुराचे संकट टळले आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी इंचा-इंचाने कमी होत आहे.
राधानगरीतून 3 हजार 28 क्युसेक विसर्ग –
काल दुपारपासून पाऊस वाढल्याने राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे धरणाचा 6 वा दरवाजा खुला झाला. या धरणाच्या दरवाजातून निर्मितीसाठी 1 हजार 600 तर 1 हजार 428 व वीज निर्मितीसाठी क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रामध्ये सुरू आहे.
12 बंधारे पाण्याखाली –
पंचगंगा नदी –
शिंगणापूर
राजाराम
सुर्वे
रुई
इचलकरंजी
तेरवाड
शिरोळ
भोगावती नदी-
हळदी
कोगे
वारणा नदी-
चिंचोली
तांदुळवाडी
दूधगंगा नदी-
दत्तवाड