घरमहाराष्ट्रभाजपचा सरकार पाडण्याचा डाव!

भाजपचा सरकार पाडण्याचा डाव!

Subscribe

विरोधकांच्या सध्या सुरु असलेल्या हालचाली पाहता महविकास आघाडी सरकार कधी जाईल याची वाट पाहिली जात आहे. हा एक प्रकारे भाजपचा सरकार पाडण्याचा डाव आहे, असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. भाजपचे नेते दोन दिवस थांबा अजून १-२ जणांची विकेट जाईल असे दावे करत आहेत. त्यानंतर एनआयमध्ये गेलेले पत्र प्रसार माध्यमांच्या हाती लागणे आणि त्यात आणखी एक दोन नावे येणे, यावरुन एक स्पष्ट होतंय की भाजपचे नेते बोलतात, त्यानंतर तसंच बाहेर येत आहे. याचा अर्थ तपास सुरु आहे की राजकारण, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.

गुरुवारी पत्रकार परिषदेत पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेताना सचिन वाझेचा म्होरक्या कोण? असा सवाल केला.स्फोटके भरलेली गाडी ठेवली हे सगळं बाजूला राहिलं आणि ज्याच्यावर आरोप आहे तो काय बोलतो तेच बाहेर येतंय. ज्याच्यावर खूनाचा आरोप आहे, अशा व्यक्तीवर विश्वास कसा ठेवायचा? तपास स्फोटकांचा, तपास खुनाचा, पण चर्चा वेगळीच होते. वाझेच्या बरोबर कोण आहे, म्होरक्या कोण आहे त्याला अटक का होत नाही? असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला. भ्रष्टाचाराची तक्रार असेल तर ती सात दिवसात करायची असते इथे तर किती तरी महिने झाल्यावर असे आरोप केले जात आहेत.

- Advertisement -

इथे लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नको त्या चर्चा केल्या जात आहेत. जीएसटी परतावा कमी दिला तर बोलायचं नाही का? केंद्राने अत्याचार केले तर बोलायचं नाही का? असेही पाटील म्हणाले. अनिल देशमुखांची प्राथमिक चौकशी झाल्यावर त्यांच्यावर ठपका असणार नाही. त्यानंतर देशमुख लवकर मंत्रिमंडळात दिसतील. सीबीआय चौकशीनंतर आमचा पक्ष त्यांचा विचार नक्की करेल. विदर्भातील ते आमचे प्रमुख नेते आहेत, असे पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -