घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकदम बरे, योग्य वाटेल तेव्हा ते येतील : पर्यटन मंत्री आदित्य...

मुख्यमंत्री एकदम बरे, योग्य वाटेल तेव्हा ते येतील : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

Subscribe

आदित्य ठाकरे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. मुख्यमंत्री एकदम बरे आहेत. कालसुद्धा कॅबिनेट बैठक झाली. त्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ते येतील, असं उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय. जेव्हा सीएमसाहेब येतील तेव्हा आपल्या सगळ्यांना कळेल, असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.

मुंबईः विधिमंडळाच्या अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली असून, विरोधकांनी सुरुवातीला पायऱ्यांवर आंदोलन केलंय. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा आजारपणामुळे अधिवेशनाला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यावरून पत्रकारांनी छेडले असता पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी त्याला उत्तर दिलंय.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. मुख्यमंत्री एकदम बरे आहेत. ते अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. कालसुद्धा कॅबिनेट बैठक झाली. त्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ते येतील, असं उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय. जेव्हा सीएमसाहेब येतील तेव्हा आपल्या सगळ्यांना कळेल, असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.

- Advertisement -

तर कालही अजित पवारांनी मुख्यमंत्री आज उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांची तब्येत उत्तम आहे. मुख्यमंत्री वर्षावर आले होते. विधिमंडळासह वरच्या आणि खालच्याही सभागृहात आले होते. आता आम्ही सर्व मंत्री उपस्थित राहण्याच्या सूचना त्यांनी केल्यात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची बैठक ही ९ वाजता विधिमंडळात घेण्यास सांगितली, असंही अजित पवार म्हणाले होते.

मुख्यमंत्र्यांना मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास

उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्या केल्या होत्या. मानेच्या दुखण्यामुळे (Cervical Spine Surgery) 12 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून गेले 22 दिवस ते रुग्णालयात होते.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -