घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राचे भवितव्य सुरक्षित झाले!

महाराष्ट्राचे भवितव्य सुरक्षित झाले!

Subscribe

आमचे आदरणीय नेते श्री. उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याची सूत्रे मावळत्या सूर्याला साक्ष ठेवत हाती घेतली तेव्हाच माझ्यासारख्या शिवसैनिकाच्या मनात विचार आला की, यापुढे राज्याचे भवितव्य सुरक्षित झाले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे काय, असे विचारणार्‍यांची तोंडे यापूर्वीच उद्धवजींनी बंद केली आहेत. महाविकास आघाडीचे सरकार ते कसे चालविणार, असे विचारणार्‍यांची तोंडेही ते कृतीतून बंद करून टाकतील, याबद्दल आम्हा सर्वांना ठाम विश्वास आहे.

संयमी आणि सुसंस्कृत उद्धवजी आम्हा शिवसैनिकांचे प्रेरणास्थान आहेत. कसोटीच्या प्रसंगात कसे वागावे, हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. महाराष्ट्र राज्यासमोर आज अनेक कसोटीचे प्रसंग आहेत. शेतकरी, बेरोजगारांच्या समस्या आहेत. उद्योग बंद होत असल्याने कामगार नाराज आहेत. मला खात्री आहे की उद्धवजी या सर्व संकटांवर मात करून शेतकरी, बेरोजगार, कामगार यांना न्याय देतील. पुढचे पाच वर्षे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार पुरोगामी महाराष्ट्राचा गाडा हाकणार आहे. वाटेत अनेक काटे आहेत, जागोजागी असंतुष्ट ‘आत्मे’ही वावरत आहेत. पण जेव्हा संकटे येतात तेव्हा उद्धवजींचे नेतृत्त्व अधिक झळाळून निघते हा अनुभव असल्याने महाराष्ट्रातील जनतेने यापुढे निश्चिंत असावे, असे वाटते.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारला हृदयातून शुभेच्छा देताना आई जगंदबेने उद्धवजींकडून महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होण्यासारखे काम करवून घ्यावे, ही प्रार्थना! जय हिंद! जय महाराष्ट्र!!

-किशोर ओ. जैन
माजी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख
सदस्य, रायगड जिल्हा परिषद

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -