Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला पाहिजे; छगन भुजबळांचे सूचक वक्तव्य

कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला पाहिजे; छगन भुजबळांचे सूचक वक्तव्य

Subscribe

नाशिक : शेतकर्‍यांनी पिकविलेल्या कांद्यास हंगामानुसार योग्य हमीभाव मिळावा त्याचप्रमाणे कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे प्रश्न (onion issue) कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर प्रयत्न करणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे. आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजार समितीस दिलेल्या भेटी दरम्यान ते बोलत होते.

यावेळी त्यांच्या समवेत बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, संचालक जयदत्त होळकर, पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, ज्ञानेश्वर जगताप, छबुराव जाधव, ललित दरेकर, तानाजी आंधळे, रमेश पालवे, डॉ.श्रीकांत आवारे, भिमराज काळे, सोनिया होळकर, श्री पठाडे, सचिव नरेंद्र वाढवणे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था फैयाज मुलाणी,विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, नाफेडचे अधिकारी यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले, कांद्याच्या प्रश्नाबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली आहे.

- Advertisement -

यासोबतच नाशिक जिल्ह्यात नाफेडचे कांदा खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी केली असून ही केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. कांद्यास अनुदान मिळण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरवा केला असून कांद्यासाठी ३५० रूपये प्रति क्विंटल अनुदान राज्य शासनाने मंजूर केले आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना ८६५ कोटी रूपयांचे अनुदान मिळणार असून ते दोन टप्प्यात शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. यापैकी ४६५ कोटी अनुदान वितरीत करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. यात ६० टक्के जिल्ह्यातील शेतकरी असून ४३५ कोटी रूपये नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वितरित होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.

ते म्हणाले की,पाऊस कमी झाल्यामुळे साहजिकच यावर्षी कांद्याचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे कांद्या प्रश्नाबाबत तोडगा काढण्यासाठी लवकरच शासनस्तरावर आणि शेतकरी प्रतिनिधी, कांदा व्यापारी, बाजार समित्यांचे पदाधिकारी यांची एकत्र बैठक घेण्यात येणार असून यात सर्वांच्या समस्या जाणून घेवून योग्य निर्णय घेतला जाईल असेही मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. यावेळी बाजार बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, संचालक जयदत्त होळकर, पंढरीनाथ थोरे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -