अपघातांच्या मालिका सुरुच असून आज एक दुर्दैवी घटना यवतमाळ-पांढरकवडा मार्गावर घडली आहे. कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने या मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. जखमीला जवळील रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सध्या या घटनेचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
असा घडला अपघात
अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव येथील चार जण गाडी घेऊन यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरुन प्रवास करत होते. दरम्यान, त्यांची गाडी पारवा गावाजवळ येताच गाडी झाडाला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्न केले जात आहे. हा अपघाता कसा घडला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसून चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा – दिलासा! देशातील रुग्णालयात उभारणार १६२ ऑक्सिजन निर्मिती प्लँट