घरताज्या घडामोडीआजपासून शाळेची घंटा वाजणार, मात्र विद्यार्थ्यांना सक्ती नाही

आजपासून शाळेची घंटा वाजणार, मात्र विद्यार्थ्यांना सक्ती नाही

Subscribe

राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असल्यामुळे मागील २० दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सुरू होणार आहे. मात्र एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास संबंधित वर्ग बंद ठेवावा, अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे म्हणाले की, शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये कोरोनाची थोडीही लक्षणे आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास संबंधित वर्ग बंद ठेवावा, अशी सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना पालकांनी काळजी करण्याचे कारण नाही. जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, हा देखील शाळा सुरू करण्यामागचा हेतू आहे. त्यामुळे पालकांनी काळजी न करता कोरोनासंदर्भातील नियम पाळावे, असे आवाहन देखील टोपे यांनी केले.
लस घेणे सक्तीचे नाही.

- Advertisement -

कोरोना लस सक्तीची नसल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. तर राज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असल्याचे सरकार सांगत आहे. यावर बोलताना,लसीची सक्ती नसली तरी आम्ही नागरिकांना विनंती करून त्यांना लस घेण्यास भाग पाडू, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे. लोकांनी नियम पाळल्यास राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येईल आणि राज्यात लागू केलेले निर्बंध मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून कमी करण्यात येतील, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. लता मंगेशकर यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली.
62 टक्के पालकांना मुलांना शाळेत पाठवणे धोकादायक वाटते.

महाराष्ट्रातील ६२ टक्के पालकांना मुलांना शाळेत पाठवणे धोकादायक असल्याचे वाटत असून ११ टक्के पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. लोकल सर्कल एका सामुदायिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने ३६ जिल्ह्यातील टीयर १,२,३ शहरांमधील ४ हजार ९७६ पालकांची मते नोंदवत हा निष्कर्ष काढला आहे.

- Advertisement -

 

शाळेत पाठवणं बंधनकारक नाही

शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटते त्या पालकांनीच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. ज्यांना वाटते रिस्क घेऊ नये, त्यांनी घेऊ नये.
आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -