घरमहाराष्ट्रचाकरमान्यांना खूशखबर, कोल्हापूर मार्गे जाणार्‍यांना टोलमाफी

चाकरमान्यांना खूशखबर, कोल्हापूर मार्गे जाणार्‍यांना टोलमाफी

Subscribe

चंद्रकांत पाटील यांनी केली घोषणा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना राज्य सरकारने खूषखबर दिली आहे. कोकणात जाणर्‍या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणार्‍या विशेष करुन कोल्हापूरमार्गे जाणार्‍या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सोमवारी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोकणात गणपतीसाठी जाणार्‍या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या रस्त्यांचा आढावा पाटील यांनी आज घेतला. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, गृहनिर्माण राज्य मंत्री रविंद्र वायकर, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक, रस्ते विभागाचे सचिव सी.पी.जोशी, सार्वजनिक बांधकाम इमारत विभागाचे सचिव अजित सगणे, राष्ट्रीय महामार्गाचे श्री देशपांडे आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, “यंदा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली होती. मात्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या नागरिकांना प्रवासात त्रास सहन करावा लागू नये, यासाठी रस्ते सुस्थितीत आणण्यात आले आहेत. काही ठिकाणी किरकोळ कामे सुरू असून, ती तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या आहेत. याचबरोबर अनेक भाविक मुंबई-कोल्हापूरमार्गे कोकणात जात असतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मुंबई -कोल्हापूर मार्गे कोकणात जाणार्‍या वाहनांना टोल माफ करण्यात येणार आहे.

पावसाने उघडीप दिल्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कामही जलदगतीने सुरु असून, रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, तिथे आवश्यकतेनुसार, रोड स्ट्रीप्स, सूचना फलक, गावांची नावे, जंक्शन बोर्ड, रॅम्बलर पट्टी, गतीरोधक लावण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्याची माहिती मंत्री पाटील यांनी यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -