घरमहाराष्ट्रनाशिकत्रिपुरारी पौर्णिमेच्या रथयात्रा उत्सवाने सोमवारी दुमदुमणार त्र्यंबकेश्वर नगरी

त्रिपुरारी पौर्णिमेच्या रथयात्रा उत्सवाने सोमवारी दुमदुमणार त्र्यंबकेश्वर नगरी

Subscribe

त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक स्थान म्हणून प्रसिद्ध असलेली त्र्यंबकेश्वर नगरी सोमवारी (दि.७) त्रिपुरारी पौर्णिमेच्या विशेष रथयात्रा उत्सवाने दुमदुमणार आहे. गेल्या १५० वर्षांपासून हा उत्सव साजरा करण्याची परंपरा त्र्यंबकेश्वर नगरीने कायम ठेवली आहे. दोन वर्षानंतर हा उत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहणार आहे. या रथयात्रेची जोरदार तयारी सुरू असून 40 हजारांवर भाविक सहभागी होण्याचा अंदाज त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे पेशव्यांचे सरदार विंचुरकर यांनी मंदिरास दिलेल्या ३१ फूट उंचीच्या भव्य रथाला तीन बैलजोड्या जुंपल्या जाणार आहेत.

त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव त्र्यंबकेश्वरात दिवाळीप्रमाणे साजरा होतो. त्रिपुरारी पौणिमेला शहरात रथोत्सव आयोजित केला जातो. भगवान शंकर व त्रिपुरासुर यांच्यात तीन दिवस भीषण युद्ध झाले. यात शिवशंकराने त्रिपुरासुराचा वध केला. तो दिवस कार्तिक शुद्ध पौर्णिमा. युद्धातील विजयाचे प्रतीक म्हणून हा रथोत्सव साजरा केला जातो. भगवान शंकराचा विजय व्हावा, म्हणून माता पार्वतीने कठोर आराधना करत या दिवशी वाती प्रज्वलित केल्याची आख्यायिका आहे.

- Advertisement -

कोरोनातील निर्बंधांमुळे दोन वर्षे 155 वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव झाला नव्हता. यंदा निर्बंधमुक्त वातावरणामुळे जोरदार तयारी सुरू असून, भाविकांची संख्याही वाढणार आहे. या मार्गावर जागोजागी आरत्या केल्या जातात. मात्र, यंदा अशा आरती न करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. परंपरेनुसार तुंगार ट्रस्ट व देवस्थानचे चार सदस्य यांच्याव्यतिरिक्त कोणीही रथावर चढणार नसल्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -