चंद्रपूर सिंदेवाहीत लग्नाचा वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकचा आज सकाळी भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या सिंदेवाहीत रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमके काय घडले?
आज (गुरुवारी) सकाळी १० ते ११ वाजल्याच्या दरम्यान रत्नापूर गावात हा विवाह सोहळा होता. यासाठी एकारा गावात जे वऱ्हाड आहे, ते रत्नापूर आले होते. विवाह सोहळा पार पडल्यानंतर हे वऱ्हाड पुन्हा एकारा गावाकडे जात होते. त्यावेळेस कच्चेपार गावाजवळ हा ट्रक अनियंत्रित झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला. ट्रक अनियंत्रित होण्याच प्राथमिक कारण डायर फुटल्याचे सांगितले जात आहे. यामुळे हा अपघात झाला असून यामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले आहेत. सिदेंवाही ग्रामीण रुग्णांमध्ये जखमींना दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच घटनास्थळी पोलीस पोहोचले आहे असून जखमींना मदत करत आहेत. पण या अपघातामधील मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा – भरधाव वाहनाची ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील ६ जखमी, २ ठार