घरमहाराष्ट्र'राहुल गांधींनी आधी आपल्या पक्षातील नालायक बघावे, मग आमच्याबद्दल बोलावे'

‘राहुल गांधींनी आधी आपल्या पक्षातील नालायक बघावे, मग आमच्याबद्दल बोलावे’

Subscribe

'राहुल गांधींनी आधी आपल्या पक्षातील नालायक बघावे, मग आमच्याबद्दल बोलावे', अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर टीका केली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणींना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोडे मारुन हाकललं, अशी टीका राहुल गांधींनी केली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली आहे. सोमवारी यवतमाळ येथील प्रचारसभेत ते बोलत होते. राहुल गांधींनी लालकृष्ण आडवाणींची काळजी करु नये. राहुल गांधी यांनी आधी आपल्या पक्षात किती नालायक माणसं आहेत ते बघा. त्यानंतर आमच्याबद्दल बोलावं, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

राहुल गांधींनी आडवाणींची काळजी करु नये. स्वत:च्या पक्षातील नालायक माणसांकडे बघावं मग आमच्याकडे बघावं, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘शेतकऱ्यांवर गोळ्या चालवणाऱ्या तुमच्या काँग्रेस नेत्यांना तुम्ही जाब का विचारत नाहीत? तुमचं सरकार असताना शेतकऱ्यांना नक्षलवादी ठरवून त्यांच्यावर गोळ्याचा चालवण्याचा आदेश कसा दिला गेला होता? आधी स्वत:च्या पक्षात किती नालायक माणसं आहेत ते बघा त्यानंतर आमच्याबद्दल बोला.’ या सभेदरम्यान त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींवर टीका केली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे देशातील जनतेला खोटी आश्वासनं देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासोबतच काँग्रेसचा जाहीरनामा हा देशासाठी घातक असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -