घरमहाराष्ट्रकटप्पा, गद्दार, बाप आणि हिंदुत्त्व; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 'हे' दहा मुद्दे वाचाच!

कटप्पा, गद्दार, बाप आणि हिंदुत्त्व; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ‘हे’ दहा मुद्दे वाचाच!

Subscribe

मुंबई – अखेर शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. गेल्या महिन्याभरापासून शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे शिवाजी पार्कसाठी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेले. शेवटी उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली. परवानगी मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे नेमकं कोणत्या विषयावर भाषण करणार, कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार, विरोधकांवर कशी टोलेबाजी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यांनी आज शिंदे गटावर शाब्दिक आसूड ओढले तसंच, भाजपावरही निशाणा साधला. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे दहा मुद्दे पाहुयात.

तुम्ही जिवंत सुरक्षाकवच

- Advertisement -

विजयादशमीच्या शुभेच्छा देत असतांना जुने दसरा मेळावे आजही लक्षात आहे. मी भारावून गेलो आहे असा मेळावा क्वचितच. तुमच प्रेम बघितल्यावर मुद्दे सुचत नाही हे विकत घेता येत नाही. माझ्या जीवाभावाची गर्दी म्हणून तुमच्यासमोर नतमस्तक. मुख्यमंत्री म्हणून नतमस्तक झालो होतो. अनुभव नव्हता. वाकण्याची परवानगी नाही पण तुमच्या समोर नेहमीच नतमस्तक. तुम्ही माझे जिवंत सुरक्षाकवच.

हेही वाचा कुणी केली गद्दारी? नंदेश उमप यांच्या जबरदस्त आवाजात शिंदे गटाकडून टीकात्मक गीत प्रदर्शित

- Advertisement -

रावण किती खोक्यांचा?

गद्दारच म्हणारच, मंत्रिपद काही काळ असतं, पण गद्दारीचा शिक्का नेहमीच कपाळावर राहणार. शिवसेनेचे काय होणार याची मला मात्र चिंता नव्हती. ही गर्दी बघितली तेव्हा प्रश्न पडला की, गद्दारांचे कसे होणार. माताभगिनी, दिव्यांग सगळेच आहेत. एकनिष्ठ इथेच आहेत. ही ठाकरेंची कमाई. रावणदहन होईल यावेळी रावण वेगळा. कालानुरूप तोही बदलतो आता किती डोक्यांचा नाही खोक्यांचा आहे.

बाप चोरणारी औलाद

वाईट इतकच मी रूग्णालयात असतांना ज्यांना जबाबदारी दिली ते कटाप्पा ते कट करत होते. त्यांना कल्पना नाही हा उद्धव ठाकरे नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. देव तुमचं भल करो हा तेजाचा शाप. ज्यांना सगळं दिलं ते नाराज झाले. ज्यांना काही दिलं नाही ते माझ्यासोबत. बाळासाहेब म्हणायचे शिवसेना एकट्यादुकट्याची नाही, शिवसैनिकांची आहे. तुम्ही ठरवाल मी राहायचं की नाही. हे गद्दारांनी नाही तुम्ही सांगायचं. बाप मंत्री, कार्ट खासदार, सगळं माझ्याचकडे पाहिजे. का केली महाविकासाघाडी? अतिशय स्पष्ट आहे. भाजपने पाठीत वार केला म्हणून. तुम्ही सांगा जे केले ते योग्य होतं का? मी हिंदुत्व सोडले का? सात लोकांत तेही होते मंत्रिपद घेतांना तेव्हा का बोलला नाही. आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो अडीच वर्ष ठरले होते. मग आज जे घडले ते तेव्हाच का नाही केल. शिवसेना संपवायची. हाव ती किती त्याला शिवसेनाप्रमुख व्हायचा तुम्ही स्वीकारणार स्वतःच्या वडिलांच्या नावाने मत मिळत नाही. बाप चोरणारी अवलाद. आनंद दिघे वीस वर्ष झाली ते जाऊन आजवर आठवले नाही. एकनिष्ठ होते.

हेही वाचा – नागपूरमधील तीन भ्रष्टाचार प्रकरणं, सुभाष देसाईंनी भर मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांची कुंडलीच मांडली

पुन्हा येईन बोलून गेले नि दीड दिवसांत विसर्जन झालं

फडणवीसांना कायदा चांगला समजतो. सभ्य गृहस्थ आहेत. तुमचं चांगलं बोललो यात काय टोमणा. जातांना बोलून गेले मी पुन्हा येईन दीड दिवसात विसर्जन पुन्हा उपमुख्यमंत्रिपद घेऊन आले. कायदा आम्हालाही कळतो आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरे पाळायची. आमच्यापैकी कुणी बोलले तर स्थानबध्दतेचे आदेश हा कुठला कायदा चालवतात? नवी मुंबईचे पोलिसांकडून धमकी, बबन पाटलांना धमकी, महिलांना धमकी हा तुमचा कायदा. ग्रामपंचायत निवडणुकीतसुध्दा धमक्या दिल्या जातात. सलून काढलंय का? मी सांगितले म्हणून सगळे शांत आहेत. कायदा तुम्ही कुरवाळत बसा.

गाईवर बोलण्याऐवजी महागाईवर बोला

इकडे जिवंत मेळावा तिकडे ग्लिसरीनच्या बाटल्या सगळं मिळून रडगाण सुरु आहे. आम्ही भाजप सोडली म्हणून हिंदुत्व सोडले नाही. भाजपने आमच्यावर टीका करायची. जीनाच्या थडग्यावर डोके टेकवणारे, नवाझ शरीफच्या वाढदिवसाला न बोलावता जाणारे तुम्ही, मेहबूबा सोबत सत्ता रचणारे तुम्ही. गाईवर बोलताना अरे महागाईवर बोला पण हे जाणवू नये म्हणून तुम्हाला हिंदुत्व सांगता. डाळ, भाज्या महागले. होसबळे तुमचे अभिनंदन तुम्ही संघाला भाजपला आरसा दाखवण्याचे धाडस केले. हे केव्हा बोलले ज्यावेळला मोदी ५ जी कार्यक्रमात कौतुक करत होते त्याच्या दुसरा दिवशी होसबळे बोलले.

हेही वाचा – सोनिया गांधींच्या पायावर 10 वर्षे लोटांगण घालून मंत्रिपदं भोगली, सुषमा अंधारेंचा राणेंवर घणाघात

गद्दारांच्या पालखीत कशाला मिरवता?

दसरा मेळावा पवित्र मेळावा. ही विचारांची परंपरा लोक प्रेमाने आले. शिव्या देणे सोपे विचार देणे ही परंपरा मी पुढे नेतो. २०१४ साली रुपयाचा भाव काय होता सुषमा स्वराज म्हण्याला टीव्ही लावायला भिती वाटते. आज ८० रुपये डाॅलर. स्वराज म्हण्याला ज्या देशाचा रूपया घसरतो त्या देशाची पत घसरते. अमित शहा हे घरगुती मंत्री. सरकार पाडायचे हेच काम. मी पुन्हा त्यांना आव्हान देतो. आपली जमीन परत आणून दाखवा पाकव्याप्यची.चीन घुसतोय. गद्दारांच्या पालखीत कशाला मिरवता. तिकडे शेपट्या घालायच्या इकडे मस्ती दाखवायची.

हेही वाचा – आई-वडिलांची आणि शिवरायांची शपथ घेऊन सांगतो…, युतीवरून ठाकरे शिवाजी पार्कात कडाडले

पुप्षा म्हणाला झुकेगा नही, हे म्हणतात उठेगा नही

आम्हाला गुजरातबद्दल असूया नाहीए. उद्योग धंद्यासाठी सगळे प्रकल्प गुजरातेत. पुष्पा आला तो म्हणायचा झुकेंगा नही यांचे उठेंगा नही साला. १०० दिवस सरकारला होताहेत त्यापैकी ९० दिवस हे दिल्लीला, दिल्लीत मुजरा. तुमच हिंदुत्व कशावर आहे? आमच हिंदुत्व देशाशी जोडलेले आहे शेंडी जानव्याचे आहे. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा सांगितले जो प्रेम करतो देशावर तो आमचा. घराबाहेर देश हाच धर्म. पण कुणी धर्माची मस्ती आम्ही सहन करणार नाही. नुसत जपमाळ करून हिंदू होणार नाही. तुमच हिंदुत्व काय आहे? इतर धर्मीय तुमचे शत्रू. काश्मीर घटना पोलीस औरंगजेब त्याचे अतिरेक्यांनी अपहरण करुन हत्या. धर्माने कोण तर तो मुसलमान होता. तो औरंगजेब आमचा भाऊ. त्याचे वडील भाजपात जाणार होते.

कुठे आहे महिला शक्तीचा आदर

देशातील लोकशाही जिवंत राहील का ही सध्या चिंता. तुम्हाला सर्वांना हा सावधानतेचा इशारा. पुन्हा गुलामगिरी येईल. देशप्रेमींनी एकत्र यावे. भागवतांच्या बद्दल आदर. ते मशिदीत गेले होते ते संवाद करायला गेले तिथे मुस्लमानांनी सांगितले ते राष्ट्रपिता मग आम्ही म्हणालो राष्ट्रपती करा. आज भागवत बोलले स्त्री पुरुष समानता. मोहनजी एक विचारायचे आहे, महिला शक्तीचा आदर ठेवतांना अंकिता भंडारीचा खून झाला, रिसोर्टच्या बाजूला मृतदेह आढळला. हाॅटेल मालक भाजपचा. कुठे महिला शक्तीचा आदर. तिची आई आक्रोश आहे. काय कारवाई झाली. बिल्कीस बानो दंगलीतील गर्भवती बलात्कार मुलीची हत्या. आरोपी शिक्षा भोगत होते शिक्षा माफ केली स्वागत केले हे भाजपचे विचार .महाराजांची शिकवण हे आमचे हिंदुत्व. माझा विचार होता त्यासभेला जाऊन हिंदुत्वाचे विचार ऐकून यायचे. मागे एक कार्टून आले हिंदुत्व जागृत करुन मिळेल ईडी कार्यालाय.

हेही वाचा – होय गद्दारच म्हणणार! बुडाला लागलेली मंत्रिपदं जातील, पण गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही; ठाकरेंचा हल्लाबोल

धनुष्यबाण हवा, शिवसेना हवी, शिवसेनाप्रमुख पद हवे

तोतयाचे बंड एक पुस्तक म्हणजे डुप्लिकेट. मागे एक होतं तो मी नव्हेच. आता तोतये त्यांना वाटत तेच बाळासाहेब. न.चि केळकर यांच्या तोतयाचे बंड नाटक त्याच्या प्रस्तावनेचा दाखला. बाळासाहेबांचा चेहरा लावून हे तोतये आले आहेत. किती ओरबडायचे शिवाजी पार्क मिळावे. आता धनुष्यबाण हवा, शिवसेना हवी, शिवसेनाप्रमुख पद हवे. एका व्यासपीठावर सभा लावू भाजपची स्क्रीप्ट न लावता बोलून दाखवायचा. मुख्यमंत्री असतांना माझ्यासमोरचा माईक ओढला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने साथ दिली. हिंदुत्व सोडले म्हणता मग पाच वर्ष तुमच्या सोबत सुध्दा अशोक चव्हाणांना कोण भेटले. संभाजीनगर करून दाखवले. दुर्दैवाने आपल्याकडून तेव्हा कोण होते मी, अनिल परब, देसाई, आदित्य सगळ्यांनी पाठिंबा दिला. त्यांना घेऊन हिंदुत्व वाढवत होतो.

हेही वाचा – आजी-माजी मुख्यमंत्र्यांची ‘बापा’वरून जुंपली; दसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदेंनी ओढले शाब्दिक आसूड

बांडगुळे गेली, त्यांना स्वतः ची ओळख नाही

अंबादास बोलले शेतकऱ्यांना मदत नाही. मी लहानपणापासून शिवसेनेवरील संकटे बघत आलो आहे. निखाऱ्यावरुन चालण्याची तयारी ठेवा. तुमच्या मदतीने शिवसेनेच्या आगीचा वणवा पेटणार आहे त्यातून हे गद्दार भस्म होतील. तुम्ही सोबत असाल तर पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री. बांडगुळे गेली, त्यांना स्वतः ची ओळख नाही. आता महाराष्ट्राच्या प्रत्येक निवडणुकी अंगावर घ्यावे लागेल. हात उंचावून सांगा (प्रचंड प्रतिसाद) मला विश्वास आहे महिषासूरमर्दीनी हा रावण मारल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद जय महाराष्ट्र

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -