घरमहाराष्ट्रकवयित्री उर्मिला कराड यांचे पुण्यात निधन

कवयित्री उर्मिला कराड यांचे पुण्यात निधन

Subscribe

पुणे : ज्येष्ठ कवयित्री, लेखिका व ‘माईर्स’ एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या पत्नी उर्मिला कराड यांचे बुधवारी निधन झाले. लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, पुतणे, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मूळच्या नाशिकच्या असलेल्या उर्मिला कराड यांचे शिक्षण नाशिकच्या एच. पी. टी. महाविद्यालयातून झाले. १९६४ साली त्यांनी मराठी विषयात बी. ए. (ऑनर्स) ही पदवी प्रथम क्रमांकाने संपादित केली. लग्नानंतर त्या लातूर येथील रामेश्वर (रुई) आल्या. एमआयटी संस्थेच्या जडणघडणीत प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांना त्यांनी मोलाची साथ दिली. सोबतच कवयित्री व लेखिका म्हणून त्यांनी त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या ‘नंदनवनात’ घडला किस्सा ‘मंगल जोड्यां’चा

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त आदरणीय कविवर्य कुसुमाग्रज हे त्यांचे स्फूर्तिस्थान होते. १९८९मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘समीर’ हा प्रकाशित झाला. नंतर त्यांनी ‘अरे संसार संसार’, ‘अनुभूती’, ‘माझी माय दुधावरची साय’ यासह अनेक लोकप्रिय कवितासंग्रह लिहिले. विविध वृत्तपत्रांतून त्यांनी अनेक विषयांवर विपुल लेखन केले. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी गुरुवारी सकाळी ९ ते ९.३० या वेळेत परमहंसनगर, कोथरूडमधील ज्ञानमंदिर या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर १०.३०च्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – दीड वर्षांत सुमारे १० लाख रिक्त जागा भरणार; केंद्र सरकारची माहिती

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -