घरमहाराष्ट्र'पक्षांतरासाठी मातोश्रीवरुन मला २५ वेळा फोन आला'

‘पक्षांतरासाठी मातोश्रीवरुन मला २५ वेळा फोन आला’

Subscribe

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पक्षांतरासाठी मातोश्रीवरुन आपल्याला २५ वेळा फोन आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींचे इनकमिंग आणि आऊटगोईंग प्रचंड वेगाने सुरु आहे. दरम्यान, शिवसेनेत सामील व्हावे यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान मातोश्रीवरुन आपल्याला वारंवार फोन येत असल्याचा गौप्यस्फोट विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. चंद्रपुर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. वडेट्टीवारांच्या या गौप्य स्फोटानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

‘मातोश्रीवरुन २५ वेळा फोन आला

विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘शिवसेनेकडून पक्षांतरासाठी मला वारंवार फोन येते आहेत. याअगोदर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेले आहेत. त्यामुळे आता दुसरा विरोधी पक्षनेता शिवसेनेला न्यायाचा आहे.’ यासाठी आपल्याला २५ वेळा फोन आल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. त्याचबरोबर पक्षांतरासाठी वर्षा बंगल्यावरुनही फोन आल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – प्रकृतीची चिंता न करता पवार साताऱ्यात; ‘साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच राखणार’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -