घरमहाराष्ट्रवेगवेगळ्या ऋतूमध्ये चोरी करणारी टोळी जेरबंद

वेगवेगळ्या ऋतूमध्ये चोरी करणारी टोळी जेरबंद

Subscribe

वेगवेगळ्या ऋतूमध्ये चोऱ्या करणाऱ्या टोळीला वाकड पोलीस जेरबंद केलं आहे. त्यांच्याकडून ऐकून ८६ कुलर हस्तगत केले आहेत.

वेगवेगळ्या ऋतूमध्ये चोऱ्या करणाऱ्या टोळीला वाकड पोलीस जेरबंद केलं आहे. त्यांच्याकडून ऐकून ८६ कुलर हस्तगत केले आहेत. ही कामगिरी वाकड पोलिसांनी केली आहे. योगेश बाबाजी पुतमाळी, अजीज बादशाह सय्यद, ज्ञानेश्वर रामराव पाल्हाळ, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपिंची नावे आहेत. दरम्यान, चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या उन्हाळा सुरू असून मोठ्या प्रमाणावर कुलर ची मागणी आहे. याच दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील डिजीवन स्नेहानजली चे गोडाऊन फोडून तब्बल ९० कुलर चोरट्यानी लंपास केले होते. या प्रकरणी तीन जणांच्या टोळीला औरंगाबाद येथुन अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ८६ कुलर हस्तगत करण्यात आले आहे. त्याची किंमत तब्बल १० लाख रुपये आहे. संबंधित टोळीतील इसमावर पुणे ग्रामीण आणि औरंगाबाद येथे गुन्हे दाखल आहेत.

- Advertisement -

आरोपी योगेश, अजीज आणि ज्ञानेश्वर हे ऋतू प्रमाणे चोरी करत त्यांनी पावसाळ्यात छत्री आणि रेनकोट चोरल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. तर शंभर हुन अधिक लॅपटॉप चोरले होते. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. सदर ची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, गुन्हे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम कुदळ आणि प्रमोद कदम,हरीश माने यांच्या पथकाने केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -