ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातापासून विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा जोर धरला आहे. राज्यात मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने मागील काही दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. यात पुढील दोन-तीन दिवसात हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, पुणे, पालघर, कोकणा, मराठवाड्सयाह उर्वरित महाराष्ट्रात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
IMD Mumbai has issued heavy rainfall warnings for Maharashtra for coming 3 days, especially for Marathwada region and it will be good for farmers in that region and around, who are waiting for good spell of rains for their crops.@RMC_Mumbai https://t.co/FzesWQ8KBb
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 16, 2021
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, आणि कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे येत्या ३ ते ४ दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने दिली आहे. खास करून मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात जोर जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. अशी माहिती के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन दिली आहे.
Good News for Farmers in Maharashtra
16 Aug, IMD मुंबई व नागपूर द्वारा जारी केलेल्या हवामानाच्या इशाऱ्या नुसार,राज्यात पुढचेे ३ दिवस मुसळधार पाऊस असण्याची शक्यता.खास करून मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात जोर जास्त असण्याची शक्यता
अधिक माहिती साठी IMDची वेबसाइट कृपया पहा pic.twitter.com/5a4hk6rp1L— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 16, 2021
यात नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद, यवतमाळ, कोल्हापूर, जालन्यात पुढील तीन दिवसांत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. राज्याच्या किनार पट्टीच्या भागात ढगांची दाटी दिसत पावसासाठी चांगले चिन्ह दिसत आहे. गेल्या २४ तासात राज्यात, खास करून मराठवाडा व बाजूच्या परिसरात माध्यम ते मुसळधार पावसाच्या नोंदी IMD कडे आली आहे.