घरउत्तर महाराष्ट्रपानसरेंच्या हल्लेखोरांना जेरबंद कधी करणार ? भाकपचे "जवाब दो.." आंदोलन

पानसरेंच्या हल्लेखोरांना जेरबंद कधी करणार ? भाकपचे “जवाब दो..” आंदोलन

Subscribe

नाशिक : कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या सुत्रधारांना सरकार जेरबंद कधी करणार? असा सवाल करत भारतीय कम्युनिस्ट पक्ष व समविचारी पक्ष, संघटनांच्या वतीने देशभरात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर ’जवाब दो…’ आंदोलन करण्यात आले.

पानसरे यांना कोल्हापूर येथे त्यांच्या घराजवळ दि. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांच्यावर गोळया घालत हत्या करण्यात आली. २० फेब्रुवारी २०१५ रोजी उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. या घटनेला आठ वर्षे पूर्ण झाली मात्र अद्यापही या घटनेतील सुत्रधारांना अटक करण्यात आलेली नाही. आजपर्यंत तपास विशेष तपास पथक(एस.आय.टी.) कडे होता आणि आता तो दहशवाद विरोधी पथक(ए.टी.एस.) कडे सोपविण्यात आला आहे. आता एटीएसचे अधिकारी न्यायालयातच म्हणतात “तपास हाती घेताच फरार आरोपिंना शोधणे कठीण आहे”. अशा टोलवाटोलवी मध्ये आणखी किती वर्षे लागणार असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

- Advertisement -

या पूर्वी महाराष्ट्रात नरेंद्र दाभोळकर, कर्नाटकात गौरी लंकेश, कलबुर्गी या पुरोगामी प्रबोधनकारांनाही असेच संपविण्यात आले आहे. एकीकडे बिल्किस बानोच्या बलात्कारी गुन्हेगारांना मुक्त करण्यात येते, त्यांचे सत्कार सोहळे आयोजित केला जातात आणि दुसर्‍या बाजुला उपेक्षित समूहाची बाजू घेणार्‍या वयोवृद्ध विचारवंतांना संशयित म्हणून तुरुंगात ठेवण्यात येते. पानसरे यांच्या मारेकर्‍यांना जेरबंद करून त्यांना शिक्षा होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे गृह खाते, त्यांच्या तपासयंत्रणांना कार्यक्षमतेने कामाला लावून न्यायालयास योग्य ते पुरावे सादर केले पाहिजेत. या अनुषंगाने योग्य तपास करून सक्षम पुरावे सादर केले पाहिजेत अशी मागणी या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी राजू देसले, जिल्हा सहसचिव दत्तू तुपे, राज्य कौन्सिल सदस्य विराज देवांग, शहर सचिव तल्हा शेख, शहर सहसचिव कैलास मोरे, जयवंत खडताळे, अरुण घोडराव, हेमंत शिंदे, मनोहर पगारे, रफिक सैयद, पुनमचंद शिंदे, सुरेश गायकवाड, मीनाताई आढाव, दिनेश वाघ, रवी उल्लहारे, सचिन अल्हट, राजू नाईक, अवेश लोहिया, सुमित शर्मा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -