राज्यातील सत्तानाट्यावर सोशल मीडियावर मीम्सचा तुफान पाऊस पडतोय. त्यातच, प्रसिद्ध किर्तनकार इंदूरीकर महाराज यांनीही सध्याच्या परिस्थितीवर किर्तनातून वाभाडे काढले आहेत. टीव्हीचं बटन दाबलं की ब्रेकिंग न्यूज, बैठक सुरू, खलबतं सुरू, तुम्ही सगळे असेच मरणार, असं म्हणत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. आज चाळीसगावमध्ये इंदुरीकर महाराजांचं किर्तन झालं, त्यावेळी त्यांनी राजकारणावर टीका केली. (… You will die like this, Indurikar Maharaj’s kirtan on the current political situation)
हेही वाचा – संकटाच्या काळात कोणीही विचारपूस केली नाही, यामिनी जाधवांचा भावनिक व्हिडीओ व्हायरल
इंदुरीकर महाराज म्हणाले की, तीन दिवस झाले राज्यात कुणालाच काही सुधरत नाही. टीव्हीचं बटन दाबलं की ऐकू येते ब्रेकिंग न्यूज, आणि बैठक सुरू.. खलबतं सुरु.. तुम्ही सगळे असेच मरणार.. असा त्यांच्या खास शैलीत इंदुरीकरांनी नेत्यांचे वाभाडे काढले.
आणखी वाचा
- माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात
- शिंदे गटाला भाजप किंवा प्रहारमध्ये विलिन व्हावे लागेल – नीलम गोऱ्हे
- प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यला जामीन मंजूर ; लैंगिक शोषण केल्याचा झाला होता आरोप
खुर्चीच्या लोभासाठी विरोधक एकत्र आले, त्यांनी तुम्हाला विचारलं का, आम्ही एकत्र येतोय असं? असं विचारत त्यांनी जनतेला सवाल केला. तुम्ही त्यांचे बोर्ड लावा, सतरंज्या झटका आणि मरा, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांनाही टोला लगावला आहे.
जे आमदार आहेत त्यांना मतदान कसं करायचं ते शिकवावं लागतं. त्यासाठी तीन तीन वेळा बैठक घ्यावी लागते. ‘झाकली मूठ सव्वा लाखाची आंधळे दळत आणि कुत्रं पीठ खातं’ असा टोला कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी सर्वच आमदारांना लगावला.