मुंबई : मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मुंबई यूथ काँग्रेस अध्यक्ष झिशान सिद्धिकी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी आक्रोश मोर्चादरम्यान धक्काबुक्का केली. असा प्रकारचा आरोप झिशान सिद्धिकी यांनी भाई जगताप यांच्यावर केला आहे.
भाई जगताप यांची हायकमांडकडे तक्रार
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या कार्यकारणीमध्ये धुसफूस सुरू आहे. मात्र हा कलह पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे झिशान सिद्धिकी यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं आहे. पक्षातील होत असलेल्या कलहामुळे मी सोनिया गांधी यांना पत्रव्यवहार केला आहे. कारण सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे आमचे नेते आहेत. पक्षाचा एक कार्यकारी नेता म्हणून हे पत्र लिहिलं आहे. त्यामुळे पक्षातील कलह हा सुटण्यास मोठी मदत होईल. असं झिशान सिद्धिकी म्हणाले आहेत. मी राहुल गांधी यांना पत्र लिहिलं आहे. एक वरिष्ठ नेता म्हणून सोनिया गांधी जे निर्णय घेतील. ते आम्हाला मान्य असेल. असं झिशान सिद्धिकी यांनी म्हटलं आहे.
Rift in #Mumbaicongress, @zeeshan_iyc MLA from suburbs writes a letter to #soniagandhi and complains about city chief #BhaiJagtap @BabaSiddique#Congress #BMCElections pic.twitter.com/kQp5CMw5H8
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaidc) November 16, 2021
पक्षात तुम्हाला स्थान मिळत नाही का?
झिशान सिद्धिकी यांनी पुढे म्हटलंय की, याबाबत मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. कारण जे काही झालं. त्याबाबत मी पत्रामध्ये लिहिलं आहे. त्यामुळे सोनिया गांधी जे काही निर्णय घेतील. ते मला मान्य असेल. असे झिशान सिद्धिकी म्हणाले. सोनिया गांधींसमोर आपले विचार प्रकट करण्याचा अधिकार सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना आहे. असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. त्यामुळे जे काही झालं. ते मी सोनिया गांधींना सांगितलं आहे. त्यामुळे नाना पटोलेंसह सोनिया गांधी ही कलह दूर करतील. दरम्यान, काँग्रेसमधून नाराजीचा धूर पुन्हा एकदा उमटताना येथे दिसत आहे.
महागाईविरोधात आंदोलन आणि काँग्रेसमधील अंतर्गत वाद
काँग्रेसने महागाईविरोधात १४ नोव्हेंबर रोजी महागाईविरोधात आंदोलन केले होते. यामध्ये काँग्रेसच्या अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. परंतु हे आंदोलन भाजपच्या विरोधाऐवजी काँग्रेसमधील वादानेच अधिक गाजले होते. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि मुंबई यूवा काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दीकी यांच्यात चांगलाच शाब्दिक वाद झाला होता. तसेच या वादाचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा: कर्मचाऱ्यांनी समितीसमोर आपलं म्हणणं मांडावं, अनिल परब यांचे आवाहन