विधानसभा निवडणुकीची धामधुम आटपल्यानंतर राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांना सुरुवात झाली आहे. काल दि. ७ जानेवारी रोजी विदर्भातील नागपूर, अकोला, वाशिम तर उत्तर महाराष्ट्रातील पालघर, नंदूरबार, धुळे अशा सहा जिल्हा परिषदांसाठी मतदान झाले होते. त्यानंतर आज त्याचा निकाल जाहीर झाला आहे. धुळे वगळता सहा पैकी पाच जिल्हा परिषदेत भाजपचा पराभव झाला आहे. तर अकोला जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडीने विजय मिळवला आहे.
धुळ्यात भाजपची एक हाती सत्ता
धुळे जिल्ह्यात माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपशी बंड करुनही त्याचा फार तोटा भाजपला झालेला नाही. भाजपने इथे एकहाती सत्ता मिळवली आहे. जि.प.च्या एकूण ५६ जागांपैकी भाजपने ३९ जागांवर विजय मिळवला आहे.
एकूण जागा – ५६
भाजप – ३९
काँग्रेस – ७
राष्ट्रवादी – ३
शिवसेना – ४
अपक्ष – ३
नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीची सरशी
नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीने सत्ता मिळवली आहे. ५६ पैकी ३३ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे.
एकूण जागा – ५६
भाजप – २३
काँग्रेस – २३
राष्ट्रवादी – ३
शिवसेना – ७
पालघर
एकूण जागा – ५७
भाजप – १२
सीपीआय(एम) – ५
काँग्रेस – १
राष्ट्रवादी – १४
शिवसेना – १८
अपक्ष – ३
वंचित – ४
अकोला
एकूण जागा – ५३
भाजप – ७
काँग्रेस – ३
राष्ट्रवादी – ४
शिवसेना – १३
वंचित – २२
अपक्ष – ४
वाशिम
एकूण जागा – ५२
भाजप – ७
काँग्रेस – ९
राष्ट्रवादी – १२
शिवसेना – ६
वंचित – ८
जनविकास आघाडी – ६
स्वाभिमानी – १
अपक्ष – ३
नागपूर
एकूण जागा – ५८
भाजप – १५
काँग्रेस – ३०
राष्ट्रवादी – १०
शिवसेना – १
अपक्ष – १
शेकाप – १