लखनऊचे शेवटचे नवाब वाजित अली शहा (Wajid Ali Shah) यांचे नाव आजही चर्चेत असते. याचे पहिले कारण म्हणजे साहित्य, संगीत आणि कलेसाठी वाजित अली शहा यांचे खूप मोठे योगदान आहे. दुसरे कारण ते म्हणजे भारताच्या इतिहासात (indian history) 300 बायका (Wife) असणारा वाजित अली शहा हा पहिला राजा होता. वाजित अली शहा यांच्या काळात ब्रिटिशांचे भारतावर वर्चस्व होते.
बहुतेक इतिहासकार या पहिल्या कारणावर सहमत आहेत की त्यांनी पर्शियन आणि उर्दूमध्ये 100 हून अधिक पुस्तके लिहिली, त्यापैकी एक नवाबाने व्यवस्थापनावर लिहिले. ज्याचे नाव दस्तूर-ए-वाजिदी होते. वाजित अली शहा यांच्या दरबारात कथक नृत्य सुरू केले होते. त्याचबरोबर त्यांच्या काळात अनेक संगीताचे राग, गझल, नझ्मे लिहिली गेली आहेत. वाजित अली शहा हे खूप अयाश असा राज होता. वाजित अली शहा हे त्यांच्या ऐशो आराम एवढे व्यस्त होते की, त्यांना त्यांच्या खजान्याबद्दल कधीच परवा केली नव्हती. तसेच वाजित अली शहा हे खूप आळशी देखील होते.
ब्रिटिशांपासून पळून जाणारा राजाचा ‘तो’ किस्सा
वाजित अली शहा हा खूप आळशी राजा होता. इतिहासात त्यांचा आळशी पणाचा सर्वात प्रचलित किस्सा म्हणजे जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी वाजित अली शहा यांना अटत करण्यासाठी येते होती. त्यावेळी त्यांचा सेवक त्यांना पुट घालण्यासाठी सेवक येईल आणि मग ते इंग्रजांपासून वाचण्यासाठी मग ते लपतील किंवा पळून जातील.
राजांनी 27 पत्नींना असा दिला घटस्फोट
वाजिद अलीच्या पत्नींबद्दल एक मनोरंजक गोष्ट म्हणजे नवाब वाजिद अली यांची इंग्रजांच्या हातून गादी गमावली. तेव्हा त्यांना कलकत्त्यात वार्षिक 12 लाख रुपये पेन्शन मिळत असे. तेव्हा तो हुगळी नदीच्या काठावर मटियाबुर्ज नावाच्या ठिकाणी अनेक किलोमीटर पसरलेल्या त्याच्या राजवाड्यात राहत होता, जिथे त्याने एक प्रकारे ब्रिटिशांच्या देखरेखीखाली राज्य केले. त्यावेळी वाजिद अलीने 31 जुलै 1878 रोजी केवळ एका दिवसात आपल्या 27 पत्नींना घटस्फोट दिला.
हेही वाचा – इशिता किशोर 7 वर्षाची असताना वडिलांचे निधन; UPSC परीक्षेच्या टॉपरची कहाणी