मुंबईत कालपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आजही मुंबईला पावसाने झोपडले आहे. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. जोरदार पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मशीद बंदर आणि भायखळा स्टेशन दरम्यान मोठ्या प्रमाणात रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे या स्टेशनदरम्यान दोन लोकल गाड्या अडकल्या आहे. यातील १५० प्रवाशांची सुटका करण्यात आली असून अद्यापही १०० ते १२० प्रवासी लोकलमध्ये अडकले असण्याची शक्यता आहे. यामुळे मदतीसाठी एनडीआरएफ(NDRF)ची टीम पाचारण करण्यात आली असून सध्या बचाव कार्य सुरू आहे.
मुंबईत रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे दोन लोकल गाड्या अडकल्या आहेत. त्यामुळे सध्या अडकलेल्या प्रवाशांना बाहेर टाकण्यासाठी एनडीआरएफचे बचाव कार्य सुरू आहे. @NDRFHQ @mybmc @Central_Railway pic.twitter.com/IeP9Lb72in
— My Mahanagar (@mymahanagar) August 5, 2020
2 local trains are stuck between Masjid & Bhaykhala station due to water on tracks. 150 passengers from 1st local going from CST to Karjat rescued by Railway staff. About 100-120 still inside. Another local coming from Karjat to CST stuck 60 mtrs away from Masjid station: NDRF
— ANI (@ANI) August 5, 2020
सीएसटीवरून कर्जतला जाणारी पहिली लोकल अडकली असून यामधील १५० प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी लोकलमधून सुरक्षित बाहेर काढले आहे. तसेच दुसरी लोकल कर्जत वरून सीएसटीकडे येणारी मशीद बंदर स्टेशनवजवळ अडकली आहे. या लोकलमधील ५० ते ६० प्रवासी आहेत. इथे पाण्याची पातळी २ ते ३ फुटापर्यंत आहे. या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम अंधेरीवरून पाचारण करण्यात आली आहे.
हेही वाचा – Mumbai Rain: मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, नागरिकांनो घरातच थांबा!