घरताज्या घडामोडीपूर्ववैमनस्यातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या!

पूर्ववैमनस्यातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या!

Subscribe

पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची चाकूने गळा चिरून आणि दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली आहे.

पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची चाकूने गळा चिरून आणि दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली आहे. वेदप्रकाश उर्फ गोळू तिवारी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

नेमके काय घडले?

उल्हासनगर कॅम्प तीन मधील खन्ना कंपाउंट येथे राहणाऱ्या वेदप्रकाश तिवारी याचे काही महिन्यांपूर्वी गोपाळ समाज वाडीत राहणाऱ्या तरुणांशी वाद झाले होते. शुक्रवारी रात्री आरोपी यांनी संगनमत करून मयत वेदप्रकाश उर्फ गोळू याला पार्टी करण्याच्या बहाण्याने बोलावून गोळुला मारहाण करण्यात आली. गोळूने आपला जीव वाचवण्यासाठी विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनच्या दिशेने पळ काढला. परंतु, आरोपी विनोद मगरे, समीर उर्फ लखु शेख, दीपक शिंदे, रवी खांडेकर, रवी वाघ, दीपक सुरडकर यांनी त्याचा पिच्छा करून त्याला पकडले. मिळालेल्या माहितीनुसार; समीर शेखने चॉपरच्या सहाय्याने वेदप्रकाशचा गळा चिरला आणि छातीवर दगडाने ठेचून हत्या केली आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मीरा रुग्णालयात हलविण्यात आले. तिथेच शनिवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुराडकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण टीमचे एपीआय अस्लम खतीब, पोलीस हवालदार विजय बनसोडे , पोलीस नाईक विनोद कामडी, पोलीस शिपाई योगेश शिंदे, सतीश सोनावणे, आर. डी. पाटील, प्रवीण कुंभार, सुभाष चव्हाण, प्रदीप खरमाळे यांच्या पथकाने काही तासातच सहाही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आता याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात जीवेठार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.


हेही वाचा – महिलेच्या प्रसूतीनंतर केले आईवर अंत्यसंस्कार; कल्याणमधील डॉक्टरचा हृदयस्पर्शी प्रसंग


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -