घरमुंबईपूर्ण देशाला फायदा होईल, असा निर्णय दिला जाईल - नरहरी झिरवाळ

पूर्ण देशाला फायदा होईल, असा निर्णय दिला जाईल – नरहरी झिरवाळ

Subscribe

मुंबई : सत्तासंघर्षाचा निकाल आज (11 मे) कोणत्याही क्षणी लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हे 16 आमदार अपात्र ठरले तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल असे कायेदतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले असताना राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पूर्ण देशाला फायदा होईल, अशा निर्णय दिला जाईल.

सत्तासंघर्षाचा निकाल आज येणार आहे आणि मी दिलेल्या निर्णयाला धरूनच तो निर्णय असेल. मी दिलेल्या निर्णयाला घटनेचा अधिकार, नियमांचा आधार, सभागृहाच्या प्रथा-परंपरा आहेत, पक्षाच्या घटना आहेत त्या गोष्टींना धरून 16 आमदारांना अपात्र केले आहे. याचा अर्थ सार्वभोम सभागृह ज्याला आपण देवानंतर स्थान देतो न्यायदेवता. त्याचा निर्णय निश्चितच अपात्रतेचा येईल असा मला विश्वास आहे. शेवटी जो निर्णय होणार आहे तो महाराष्ट्रापुरता मर्यादीत न राहता होणारा निर्णय चिरकाल पूर्ण देशाला फायदा होईल किंवा जो निर्णय होईल तो अशापद्धतीने कुठल्याही राज्यात बंडखोरी होणार नाही किंवा होऊ नये यादृष्टीने असेल. अपात्र झाल्यानंतर काय होईल हे मी सांगून शकत नाही, पण अपात्र झाले तर मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या 16 अपात्र आमदारांमध्ये आहेत. ते 16 अपात्र झाले तर मुंख्यमंत्री पदाला धोका होऊ शकतो त्यामुळे हे सरकार पडू शकते.

- Advertisement -

गेल्या वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे काही आमदारांसह अचानक थेट गुजरातला निघून गेले. ते का निघून गेले. त्याचे कारण काय, याची चर्चा सुरु झाली. अखेर भाजपच्या मदतीने शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्याचे स्पष्ट झाले. तेथून शिवसेना फुटीचा प्रवास सुरु झाला. शिवसेनेचा एक एक आमदार शिंदे यांच्या गटात सामील होत होता. त्याचवेळी महाविकास आघाडीने मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीचा व्हीप जारी करण्यात आला. या बैठकीला एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असलेले 16 बंडखोर आमदार उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची नोटीस जारी करण्यात आली. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ही नोटीस जारी केली. त्याचदरम्यान 16 बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्षाविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस जारी केली.

या दोन्ही नोटीसचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला. त्यावर सुनावणी सुरु असतानाच तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. तेही प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचले. याच गोंधळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे व देवेंंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानुसार शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. सत्तासंघर्षाचा निकाल आज कोणत्याही क्षणी लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार की नाही याकडे या सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -