घरठाणेकोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना मदतीचा हात; ठाणे जिल्हा प्रशासनाचे अनोखे पाऊल

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना मदतीचा हात; ठाणे जिल्हा प्रशासनाचे अनोखे पाऊल

Subscribe

अनाथ बांलकासाठी 'सेव्ह द चिल्ड्रन' यांच्या संयुक्त विद्यमाने कक्ष तयार केला असून ८३०८९९२२२, ७४०००१५५१८ ही हेल्पलाईनदेखील सुरू केली आहे.

संपूर्ण जगात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या महामारीत अनेकांच होत्याच नव्हत झाल. काहीजणांना आपली नोकरी गमवावी लागली. काही जणांचे पोट भरणारा व्यवसाय बंद झाला तर हातावर पोट असणाऱ्या वर देखील भूकेल्या पोटी झोपी जाण्याची वेळ आली आहे. या महामारीत अनेक निष्पाप लोकांना आपला प्राण गमवावा लागला. काहीजणांनी अपाल्या अख्या कुटुंबाला गमावले. या महामारीत आईवडीलांच्या मृत्यूमुळे अनेक मुलांचे छत्र हरपल्याने ती अनाथ झाली. आम्हाला सांभाळणार कोण ? आमचे काय होणार? आमच भविष्य कसे असेल ? असे अनेक मोठे प्रश्न या अनाथ मुलांच्या समोर आहेत. आई-वडील दोघांचेही निधन झाल्याने घरात बाळाला, बालकांना पहायला कुणीच नाही. काही जणांच्या नातेवाईकांनीही साथ सोडली. ही गोष्ट लक्षात घेत ठाणे जिल्हा प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बलकांना मायेचा आधार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अशा कठीण प्रसंगी अनाथ बांलकासाठी ‘सेव्ह द चिल्ड्रन’ यांच्या संयुक्त विद्यमाने कक्ष तयार केला असून ८३०८९९२२२, ७४०००१५५१८ ही हेल्पलाईनदेखील सुरू केली आहे.

 

- Advertisement -

ठाणे जिल्हा प्रशासनाच्या या मदतीच्या हातामुळे अनाथ बालकांना वाली मिळाला आहे. या उपक्रमाअंतर्गत तान्हुल्या बाळापासून ते जाणत्या बालकांपर्यंतच्या अनाथांना पालकत्व मिळवून देण्याचे प्रयत्न महिला व बाल विकास विभागातर्फे केले जात आहेत. कोरोनाचा मोठा फटका हा ठाणे जिल्ह्यालाही बसला असून संपूर्ण कुटुंबे संसर्गाने त्रस्त झाली आहेत. दुर्दैव म्हणजे रुग्णालयात कुटूंबे उपचार घेत असताना घरातील काही सदस्य दगावत आहेत. कुठे बापलेक तर कुठे मायलेक एकाच वेळी मृत्यूमुखी पडल्याच्या अनेक घटना अलीकडे घडल्या आहेत.दुर्दैवाने जर कोरोनामुळे आई-वडीलांचा मृत्यू झाला असेल आणि घरी लहान बाळ, बालके असतील तर पुढे काय ? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे. अशा बालकांना दत्तक देण्याची योजना सुरू असल्याच्या अफवाही सगळीकडे पसरल्या आहेत.

 

- Advertisement -

त्यामुळे आणखीनच याबद्दल संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या अशा अफवांवर विश्वास ठेवू नये उलट जिल्हा प्रशासनाशी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहेत या उपक्रमाअंतर्गत महिला व बालविकास विभागातील अधिकारी कर्मचारी अनाथ बालकाच्या नातेवाईकांना भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या नातेवाईक, मित्रमैत्रिणींशी संपर्क साधून ते त्या नातेवाईकांना बाळाला सांभाळण्याची विनंती करुन, जे पालकत्व घेण्यास तयार होतील त्यांची खात्रीशीर माहिती घेतल्यानंतर, शासनाच्या योजनेनुसार दरमहा दोन हजारांचा भत्ता देण्यात येणार आहे. जर त्या बालकांना कुणीच सांभाळण्यास तयार नसेल तर जिल्हा प्रशासन त्यांची संपूर्ण जबाबदारी घेणार आहे. बाळ जर तान्हुले असेल किंवा १ ते पाच वर्षांपर्यंत असेल तर शिशू संगोपन केंद्रामध्ये त्याला ठेवण्यात येणार आहे. जर त्यांना दत्तक घेण्यासाठी कुणी पुढाकार घेतला तर शासनाच्या शासनाच्या कायद्यानुसार ते त्यांना दत्तक देण्यात येईल. जर संबधीत बालक पाचवर्षापुढील असेल तर त्यांना बालसंगोपन केंद्रात महिला व बालविकास विभागातर्फे ठेवण्यात येणार आहे.

 

हेल्पलाईनवर मदतीसाठी फोन आल्यास महिला व बालविकास विभागातर्फे पुढील कार्यवाही केली जाणार आहे. या विभागातील अधिकारी कर्मचारी सर्वप्रथम त्या कुटुंबाला किंवा बालकांना भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतील. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या नातेवाईक, मित्रमैत्रिणींशी संपर्क साधून त्यांना बाळांना सांभाळण्याची विनंती करतील. जे पालकत्व घेण्यास तयार होतील त्यांची सर्व माहिती कागदपत्रे घेऊन त्यांना शासनाच्या योजनेनुसार दरमहा दोन हजारांचा भत्ता दिला जाईल. पण जर त्या बालकांना कुणीच सांभाळण्यास तयार नसेल तर शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन त्यांची जबाबदारी घेणार. बाळ जर तान्हुले असेल किंवा १ ते पाच वर्षांपर्यंत असेल तर शिशूसंगोपन केंद्रामध्ये त्याला ठेवण्यात येईल. त्यातूनही जर त्यांना दत्तक घेण्यासाठी कुणी पुढाकार घेतला तर शासनाच्या नियमअटीनुसारच सर्व प्रक्रीया पार पाडली जाणार आहे. आणि जर बालके पाचवर्षापुढील असेल तर त्यांना बालसंगोपन केंद्रात ठेवण्यात येणार आहे.

-महेश गायकवाड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -