भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी चार महिलांसह ८ जणांना अटक केली आहे. एकुण २६५ जणांची या टोळीने आर्थिक गुंतवणूक आणि अधिक परतावा मिळवण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. शांतीनगर पोलिसांनी माहिती मिळाल्यावर या टोळीचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. या टोळीकडून एकुण ७४ लाख रुपयांचा मुद्देमाल आणि २.५ किलोग्राम सोनं जप्त केले आहे. पोलिसांनी सांगितले की ही टोळी मुख्य आरोपी रुबी मुस्तकीन अन्सारी चालवत होती. सर्वसामान्य नागरिकांना गुंतवणूक करुन जास्त परताव्याचे आमिष दाखून त्यांना लुटण्याचे काम करत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी रुबी आन्साररी आणि तिच्या साथीदारांसह लोकांना लुबाडण्याचे काम करत होती. या टोळीमध्ये ४ महिला आणि ४ माणसांचा समावेश आहे. ही या आठ जणांची टोळीने एक बनावट गुंतवणूक करणारी कंपनी तयार केली होती. या टोळीतील महिला मध्यमवर्गीय नागरिकांना निशाणा करुन गुंतवणूक करण्यास भाग पाडत होते. वेगवेगळ्या योजनांचा वापर गुंतवणूक करण्यासाठी मध्यमवर्गीय महिलांना प्रवृत्त केले जात होते.
ठाणे पोलिसांचे झोन २ चे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार ही टोळी १० ग्रॅम सोन्याच्या गुंतवणूकीवर दरमाहा एकुण १५०० रुपये गुंतवणूक करण्याची योजना दाखवली तसेच १ लाखाच्या गुंतवणूकीमध्ये १० हजार रुपयांची ऑफर देण्यात येत होती. सुरुवातील जास्त नागिरकांनी गुंतवणूक करावी यासाठी गुंतवणूक दारांना सांगितल्याप्रमाणे परतावा दिला होता. यानंतर काही महिन्यांनी गुंतवणूक करण्याची मुदत संपल्यानंतर रक्कम देण्यावर किंवा पैसे परत देण्याबाबत डिलींग करण्यास सुरुवात करण्यात आली.
शबनम शेख या गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीने जेव्हा शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली तेव्हा या टोळीचा पर्दाफाश झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी आपल्या नेतृत्वत एक पथक तयार केले. या पथकाद्वारे गुंतवणूक करणाऱ्या सर्व २६५ नागरिकांचा जबाब नोंदवण्यात आला यानंतर या ८ जणांच्या टोळीला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान या टोळीकडून गुंतवणूदारांनी गुंतवणूक केलेली ७५ लाखाची रक्कम आणि आडीच किलो सोने जप्त केले आहे.