घरमुंबईसंजय राऊतांना वाऱ्यावर सोडले, उद्धव ठाकरेंना इतका विसर पडलाय; प्रवीण दरेकरांचा टोला

संजय राऊतांना वाऱ्यावर सोडले, उद्धव ठाकरेंना इतका विसर पडलाय; प्रवीण दरेकरांचा टोला

Subscribe

मुंबई – उद्धव ठाकरेंनी ईडीच्या अटकेत असलेले संजय राऊत यांना वाऱ्यावर सोडल्याचे भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्याकडून संजय राऊत यांच्याबाबत काळजी व्यक्त करणारे एकही वक्तव्य देण्यात आलेले नाही. संजय राऊत शिवसेनेचे नेतेच नव्हे इतका विसर उद्धव ठाकरे यांना पडल्याचा टोला दरेकरांनी लगावला. शरद पवारांनी संजय राऊत यांच्याबाबत भाष्य केले नसल्याकडे दरेकरांनी लक्ष वेधले.

भाजप आमदार प्रवीण दरेकर पंढरपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्यावर निशाणा साधला. संजय राऊतांना वाऱ्यावर सोडल्यासारखे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेकडून वर्तणूक सुरू असल्याचे दरेकरांनी सांगितले. यावेळी आता उद्धव ठाकरे यांच्या हातात काहीच राहिले नसून बुडत्याला काडीचा आधार लागतो. त्याप्रमाणे मिळेल तो आधार घेण्याचा ठाकरे यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, असा टोला दरेकरांनी लगावला. ज्यांनी सावरकरांवर टीका केली, ज्यांनी हिंदुत्वावर टीका केली, ज्यांनी छत्रपतींच्या आणि इतरांच्या संदर्भात वादग्रस्त भूमिका घेतल्या, त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका शिवसेनेने घेतली. यावरून उद्धव ठाकरे यांना अजूनही काहीच समजत नाही हे दुर्दैव असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

अभिजित पाटील यांच्यावर आयकर विभागाने छापे टाकले असले तरी आयकर विभाग त्यांचे काम करेल असे दरेकर यांनी सांगितले. मुंबई जिल्हा सहकारी बँकेने पाटील यांच्यासह राज्यातील अनेक साखर कारखान्यांना कर्जे दिले असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या घरासह ऑफीस, कारखाने आणि पतसंस्थांवर आयकर विभागाकडून 25 ऑगस्ट रोजी छापेमारी करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकत पाटील कारखान्याचे अध्यक्ष झाले होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -