HomeमुंबईMumbai : गेट वे ऑफ इंडियाजवळ बोट उलटली; तिघांचा मृत्यू तर 77...

Mumbai : गेट वे ऑफ इंडियाजवळ बोट उलटली; तिघांचा मृत्यू तर 77 प्रवाशांना वाचवण्यात यश

Subscribe

गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट उलटल्याची माहिती समोर येत आहे. गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटा बेटाला जाणारी प्रवासी बोट उलटली. या बोटीत 80 हून अधिक प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई : गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट उलटल्याची माहिती समोर येत आहे. गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटा बेटाला जाणारी प्रवासी बोट उलटली. या बोटीत 80 हून अधिक प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अपघात झाल्याची माहिती मिळताच परिसरातील इतर बोटी मदतीसाठी धावल्या आहेत. (Boat carrying over 30 passengers capsizes near Gateway of India)

मुंबईत गेट ऑफ इंडिया पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येत असतात. गेट ऑफ इंडिया पहिल्यानंतर काही पर्यटक एलिफंटा येथील लेणी पाहण्यासाठी जात असतात. आजही नीलकमल (खाजगी) नौका 80 प्रवाशांना घेऊन गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा दरम्यान प्रवास करत होती. यावेळी नेव्हीच्या स्पीड बोटने प्रवासी बोटीला बुचर आयलंडजवळ धडक दिली आणि अपघात घडला. सदर प्रवासी बोट उरण, कारंजाजवळ उलटल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Aaditya Thackeray : करोडो लोकांना सन्मान देणाऱ्या महामानवाबद्दल किती हा द्वेष; ठाकरेंची भाजपवर टीका

- Advertisement -

दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील इतर बोटी घटनास्थळी पोहचल्या आणि त्यांनी मदतकार्य सुरू केलं. यानंतर नौदलाच्या 11 नौका, सागरी पोलिसांच्या 03 बोटी, तटरक्षक दलाची 01 बोट आणि 4 हेलिकॉप्टर तैनात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 3 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 77 प्रवाशांना सुखरुप वाचवण्यात यश आले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करताना म्हटले की, एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलीस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलीस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

उपमुख्यमंत्र्यांकडून बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश

दरम्यान, एलिफंटाला जाणाऱ्या प्रवासी बोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलीस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली. याशिवाय नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असेही एकनाथ शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले होते.

हेही वाचा – Maharashtra Cabinet : घराणेशाहीवर टीका करणाऱ्यांनी…, ठाकरे गटाचे भाजपावर शरसंधान


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -