वसईतील चिंचोटी धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेले ४० पर्यटक अडकले आहेत. पाण्याचा प्रवाह वाढल्याने बचाव कार्यात अनेक अडथळे येत आहेत. बचावकार्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. धबधब्यावर अडकलेल्या ३५ जणांनी झाडांचा आधार घेऊन सुखरूप वाचवण्यात यश आलं असून अद्याप ५ जण बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरु आहे. दरम्यान बोरीवलीच्या जे.एम. फॅनॅनशिअलमध्ये काम करणाऱ्या भावेश गुप्ता यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
चिंचोटी धबधब्यावर पायी जाण्यासाठी दोन तास लागतात. त्यामुळे वसईच्या तहसिलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हेलिकॉप्टरची मागणी केली. या सर्वांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात येणार आहे, असं ही सांगण्यात आलं आहे.