घरमुंबईराहुल गांधींनी स्वतःच्या आजीचे पत्र तरी वाचले का? आशिष शेलारांचा खोचक प्रश्न

राहुल गांधींनी स्वतःच्या आजीचे पत्र तरी वाचले का? आशिष शेलारांचा खोचक प्रश्न

Subscribe

राहुल गांधींनी नेहरू वाचले नाहीत, इंदिरा गांधींचा अभ्यास केला नाही. आता केवळ केरळ मध्ये सत्ता आल्यानंतर केवळ हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मतं एवढाच राहुल गांधींनी अभ्यास केला.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल क्षेपार्ह वक्त्यव्य केल्याने त्यांच्यावर टीका केली. त्यावरूनच राहुल गांधी यांच्या विरोधात राजकीय वर्तुळातूनही टीका करण्यात येत आहे. अशातच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांनी इंदिरा गांधी यांनी सावरकरांसाठी लिहिलेल्या पत्राचे वाचन करत राहुल गांधींवर टीका केली आहे.

या पत्रकार परिषदेत आशिष शेलार म्हणाले; इंदिरा गांधी यांनी स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारताचे सुपुत्र आहेत. वीर सावरकर म्हणून इंदिरा गांधी यांनी सावरकरांचा पात्रात उल्लेख केला आहे आणि राहुल गांधी यांनी स्वतः त्यांच्या भाषणात वीर या शब्दावर ताशेरे ओढले तेव्हा राहुल गांधींनी त्यांच्या आजीचे पत्र वाचले नाही असं आशिष शेलार म्हणाले.

- Advertisement -

इंदिरा गांधींचे पत्र वाचताना शेलार पुढे म्हणाले; सावरकर धाडसी होते असे इंदिरा गांधी म्हणतात. त्याचबरोबर सावरकरांनी ब्रिटिशांविरोधातील लढ्यात जे योगदान दिले याची नोंद इतिहासात होईल. असे अशील शेलार म्हणाले.

rahul gandhi

- Advertisement -

या संदर्भतच पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, राहुल गांधींनी नेहरू वाचले नाहीत, इंदिरा गांधींचा अभ्यास केला नाही. आता केवळ केरळ मध्ये सत्ता आल्यानंतर केवळ हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मतं एवढाच राहुल गांधींनी अभ्यास केला. राहुल गांधींचे हे विधान म्हणजे बेअक्कलपणा आहे असं म्हणत आशिष शेलारांनी राहुल गांधींना टोला लगावला. त्याच बरोबर राहुल गांधींच्या या विधानाचा निषेध करत असल्याचे शेलार म्हणाले. राहुल गांधींच्या बुद्दीवर हिरवं झाकण बसलं आहे त्या राहुल गांधींना भगव्या आणि हिंदुत्वाची ताकद कळणे कठीण असे असेही शेलार म्हणाले.

यावेळी बोलताना शेलारांनी उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला; मी, माझा पक्ष आणि माझ्या पक्षाला सत्ता देणारे सहकारी एवढाच विचार करत उद्धव ठाकरे यांनी केला स्वतःच्या वडिलांच्या विचारांना तिलांजली देत उद्धव ठाकरेंनी बोटचेपी भूमिका का घेतली? असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरेंनी इतिहासाचा अभ्यास करावा नाहीतर जुन्या मैत्रीचा दाखला म्हणून आम्ही जी पुस्तकं देऊ ती त्यांनी जरूर वाचावीत जे स्वतःच्या वडीलांचे विचार विसरले तर इतिहाच विसरले तर त्यात नवल काय असा खोचक टोला सुद्धा शेलारांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

त्याचबरोबर भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून यात्रा थांबवून दाखवा अशी असं राहुल गांधी म्हणतात आणि लक्ष वेधून घेत आहेत. त्याचबरोबर फडणवीसांना आव्हान करण्यापूर्वी स्वतःच्या आजीचे पत्र वाचा असे शेलार म्हणाले.


हे ही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -