घरमुंबईविकासासह पालिकेच्या तीन अधिकार्‍यांना अटक

विकासासह पालिकेच्या तीन अधिकार्‍यांना अटक

Subscribe

भिवंडीतील जीलानी इमारत दुर्घटना प्रकरण

भिवंडी शहरातील धामणकर नाका पटेल नगर येथे धोकादायक असलेली जीलानी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३८ रहिवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सरकारी आदेशानुसार येथील नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सखोल तपास करून पोलिसांनी तब्बल पाच महिन्यांनी महानगरपालिकेच्या तत्कालीन प्रभाग अधिकार्‍यांसह तिघांना आणि विकासक आशा चौघांना पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रभाग अधिकारी सुदाम जाधव, बिट निरीक्षक सुनील वगळ आणि प्रकाश तांबे आणि विकासक फंडोळे या चौघांना अटक करण्यात आली. शहरातील धामणकर नाका परिसरात असलेली जीलानी इमारत २१ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास कोसळली होती. या दुर्घटनेत ३८ रहिवाशांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती. ही इमारत अतिधोकादायक असल्याने पालिका प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी इमारतीस दोन वेळा नोटीस बजावली होती.

- Advertisement -

इमारतीमध्ये राहणार्‍या रहिवासी यांना घरातून बाहेर काढून इमारत पडणे गरजेचे होते. असे असताना त्यांनी आपल्या कामात कसूर केल्याने ही इमारत दुर्दैवाने कोसळली. या दुर्घटनेत ३८ रहिवाशांचा मृत्यू झाला. त्यामुळे नारपोली पोलीस ठाण्यात या इमारत दुर्घटना संदर्भात गुन्हा दाखल केला होता. मात्र, तब्बल ७ महिन्यांनी या गुन्ह्यातील चौघांना अटक झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -