घरमुंबईमुंबईमध्ये आठवीच्या ५ विद्यार्थिनी बेपत्ता

मुंबईमध्ये आठवीच्या ५ विद्यार्थिनी बेपत्ता

Subscribe

कुलाबा पोलीस स्टेशनबाहेर पालकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. कुलाबा पोलिसांचे विविध पथके विद्यार्थिनींचा शोध घेत आहेत.

मुंबईमध्ये पाच विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. आठवीमध्ये शिकणाऱ्या पाच मुली शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झाल्या आहेत. पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुलाबा पोलिसांकडून मुलींचा शोध सुरु आहे.

परिक्षेत कमी गुण मिळाल्याने नाराज

फोर्ट कॉन्व्हेट स्कूल कुलाबा येथे या ५ ही विद्यार्थिनी शिकतात. शुक्रवारी या विद्यार्थिनींचा ओपन डे म्हणजे परीक्षेचा निकाल होता. या विद्यार्थिनींना परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्या नाराज झाल्या. दुपारी अडीचला शाळा सुटल्यानंतर या मुली घरी गेल्या नाही. तर मरीन ड्राईव्ह येथे बसल्या होत्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्याचे समोर आले.

- Advertisement -

कुलाबा पोलिसांकडून तपास सुरु

मुली घरी न आल्यामुळे चिंतेत आलेल्या पालकांनी आधी शाळेत धाव घेत विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी थेट कुलाबा पोलीस ठाण्यात धाव घेत. यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली. कुलाबा पोलिसांची वेगवेगळी पथके या विद्यार्थिनींचा शोध घेत आहे. काल दुपारपासून कुलाबा पोलीस ठाण्याबाहेर पालकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -