घरमुंबईकोणत्या पद्धतीने होते बहुमत चाचणी, काय आहे प्रक्रिया?

कोणत्या पद्धतीने होते बहुमत चाचणी, काय आहे प्रक्रिया?

Subscribe

महाराष्ट्र विधानसभेत उद्या (30 जून) ठाकरे सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी याबाबत आदेश दिले आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाने बंडखोर केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे पत्र राज्यपालांना दिले होते. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि विधानसभा सचिवालयाला पत्र पाठवून उद्या विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशात बहुमत चाचणी करण्याबाबत सांगण्यात आले आहे.

बहुमत कसे सिद्ध केले जाते?  –

- Advertisement -

बहुमत चाचणीद्वारे विद्यमान सरकारकडे बहुमताचा आकडा आहे की नाही हे ठवले जाते. ही चाचणी घेण्यासाठी विधानसभेचे विशेष सत्र बोलावले जाते. निवडऊन आलेल्या सर्व आमदारांपैकी सभागृहात  असलेले किती आमदार मतदान करतात, यावर बहुमत चाचणीचा निकाल ठरतो  मतदान करायचे की नाही, याचा निर्णय  आमदार स्वत: घेऊ शकतात. जेवढ्या आमदारांनी मतदान केले, त्याच निकषावर बहुमताचा आकडा ठरतो. राज्यपालांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले असले तरी या प्रक्रियेत राज्यपालांचा हस्तक्षेप नसतो. बहुमत चाचणी ही पारदर्शक प्रक्रिया असून यासाठी आमदारांना व्यक्तिश: हजर राहावे लागले. बहुमत चाचणीसाठी आवाजी पद्धतीने, शीरगणतीने, हात उंचावून किंवा गुप्त पद्धतीने मतदान घेतले जाते. मतदान कोणत्या पद्धतीने घ्यायचं हा निर्णय राज्यपालांचा असतो. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात शीरगणतीने मतदान घेण्याचे आदेश दिला आहे.दरम्यान विधानसभेत उपस्थित राहण्यासाठी पक्ष व्हिप जारी करतो.

महाराष्ट्र विधानसभेत बहुमताचा आकडा काय –

- Advertisement -

राज्याच्या विधानसभेत 288 आमदार आहेत. त्यामुळे बहुमतासाठी 145 आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे. ज्या पक्षाकडे आकडे जास्त तो पक्ष सरकार स्थापन करु शकतो.

शिवसेनेची सुप्रीम कोर्टात याचिका –

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकार दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आजच सुनावणी होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या निर्देशाविरोधात याचिका दाखल केली. यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने तातडीने याप्रकरणी सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -