घरमुंबईमला झेंडा बदलण्याची गरज नाही

मला झेंडा बदलण्याची गरज नाही

Subscribe

मनसेने हिंदुत्त्वाचा विषय हाती घेत आज आझाद मैदानात भव्य मोर्चा काढला. यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे बोलले जात होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली हिंदुत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. मला माझे हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. बाळासाहेब ठाकरेंचे जे हिंदुत्व होते ते शुद्ध होते, तेच माझे हिंदुत्व आहे. त्यासाठी मला झेंडा बदलण्याची गरज नाही, हे संपूर्ण जगाला माहिती आहे, अशी असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज यांना टोला लगावला आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे शिवसेनेचे मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ठाकरे यांनी हिंदुत्त्वाबद्दल आपल्या भूमिकेचा पुर्नच्चार केला.

राज ठाकरे यांनी २३ जानेवारी रोजी घोषणा केल्याप्रमाणे आज पाकिस्तान-बांगलादेशी घुसखोरांविरोधात आझाद मैदानावर मोर्चा काढला. या मोर्चामुळे शिवसेनेकडून हिंदुत्त्वाचा विषय हिसकवण्यात मनसे यशस्वी होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. शिवसेनेने आपले हिंदुत्त्व सोडलेले नाही. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली म्हणजे हिंदुत्व सोडले असे होत नाही. आम्ही आजही हिंदुत्त्ववादीच आहोत. मात्र महाराष्ट्राचा विकास हे आमच्या अग्रक्रमावर आहे, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी बैठकीत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

तसेच शिवसेनेची बैठक ही महाराष्ट्राचा विकास आणि शेतकर्‍यांच्या विषयाबाबत होती, असे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकार राज्यात चांगले काम करत आहे. दोनच महिन्यात राज्याने कर्जमाफी आणि १० रुपयात जेवणाची थाळी हे मोठे निर्णय घेतले आहेत. तसेच बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हुसकवण्याची भाषा पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनीच वापरली होती. आता हा मुद्दा कुणी हातात घेत असेल तर त्यावर आमची काही हरकत नाही, असेही एकनाथ शिंदे यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -