घरमुंबईIndian Railway : रेल्वेने 186 ट्रेन्स केल्या रद्द; असा मिळवा तिकिटांचा परतावा

Indian Railway : रेल्वेने 186 ट्रेन्स केल्या रद्द; असा मिळवा तिकिटांचा परतावा

Subscribe

भारतीय रेल्वेने गुरुवारी देशभरातील 186 गाड्या रद्द केल्या आहेत. त्याचवेळी आरओबी (रेल्वे ओव्हर ब्रिज) बांधकामामुळे अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पॅसेंजर, मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान या रद्द केलेल्या रेल्वे तिकिटांचा परतावा कसा मिळवायचा जाणून घेऊ…

भारतीय रेल्वेने ट्रेन रद्द केल्यास तिकीट रद्द करण्याची गरज नाही. कारण हे तिकीट आपोआप रद्द होते आणि पैसे आपोआप रिफंड केले जातात. तिकीटची डिपॉजिट रिसीप्ट (TDR) देखील सबमिट करणे आवश्यक नाही. गुरुवारी रद्द झालेल्या गाड्यांमधील तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना पैसे परत केले जात आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील रेल्वेच्या वेगवेगळ्या झोनमध्ये सुरू असलेली दुरुस्ती आणि इतर कारणांमुळे रेल्वेने इतक्या गाड्या न चालवण्याचा निर्णय घेतला आहे . या गाड्या रद्द झाल्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये ट्रेन क्रमांक 11079, 12550, 12550, 13152, 13152, 13308, 13308, 13308, 19409 आणि 19409 यांचा समावेश आहे. यासोबतच एकूण 18 गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे.

या कारणांमुळे रद्द करण्यात आल्या रेल्वे गाड्या

गाड्यांच्या वेळापत्रकातील बदल, त्यांच्या मार्गात बदल अशी अनेक कारणे आहेत. ट्रेनचे रुळ दुरुस्त करण्यासाठी आणि मोठी दुर्घटना टाळण्यासाठी अनेक वेळा ट्रेन रद्द करावी लागते. कधी कधी वादळ, धुके, पूर यासारख्या खराब हवामानामुळेही गाड्यांच्या वेळा आणि मार्गात बदल करावा लागतो.

- Advertisement -

पश्चिम रेल्वेच्या पारडी आणि अतुल रेल्वे स्थानकादरम्यान आरओबीच्या बांधकामासाठी गुरुवारी वाहतूक आणि पॉवर ब्लॉकसाठी काही गाड्या रद्द, शॉर्ट टर्मिनेट आणि रेग्युलेटेड केल्या जात आहेत.

सीपीआरओ सुमित ठाकूर यांच्या मते, गुरुवारी उमरगाम रोड-वलसाड मेमू आणि वलसाड-उमरगाम रोड मेमू रद्द करण्यात आली आहे.. वांद्रे टर्मिनस – जयपूर समर स्पेशल 1 तास 50 मिनिटांसाठी नियमित केली जात आहे. तर मुंबई सेंट्रल – पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस 1 तास 40 मिनिटांसाठी आणि वांद्रे टर्मिनस – श्री माता वैष्णो देवी कटरा स्पेशल 1 तास 15 मिनिटांसाठी नियमित केली जाते.

वांद्रे टर्मिनस-अमृतसर पश्चिम एक्स्प्रेस 40 मिनिटांसाठी, वांद्रे टर्मिनस-चंदीगड सुपरफास्ट एक्स्प्रेस 30 मिनिटांसाठी, तर अमृतसर-वांद्रे टर्मिनस पश्चिम एक्स्प्रेस 2 तास 40 मिनिटांसाठी रेग्युलेट केली आहे. याशिवाय अहमदाबाद-मुंबई सेंट्रल गुजरात सुपरफास्ट एक्स्प्रेस 2 तास 40 मिनिटांसाठी, अहमदाबाद-मुंबई सेंट्रल गुजरात सुपरफास्ट एक्स्प्रेस 2 तास 40 मिनिटांसाठी रेग्युलेट केली आहे.

यासोबतच श्री माता वैष्णोदेवी कटरा-वांद्रे टर्मिनस स्पेशल 1 तास 20 मिनिटांसाठी, पोरबंदर-मुंबई सेंट्रल सौराष्ट्र एक्स्प्रेस 35 मिनिटांसाठी, तर हरिद्वार-वलसाड सुपरफास्ट एक्स्प्रेस 30 मिनिटांसाठी आणि गोरखपूर-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस 30 मिनिटांसाठी, तर गोरखपूर-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस 30 मिनिटे रेग्युलेट 20 मिनिटांसाठी नियमित केली आहे.


महाआयडी, गोल्डन रेकॉर्ड उपक्रम यशस्वी करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -