मोदींच्या स्वागतासाठी , कल्याण पुर्वेत गाजराचे तोरण ! | #MyMahanagar #kalyanMetro @narendramodi @Dev_Fadnavis pic.twitter.com/c7Gabm4ohE
— My Mahanagar (@mymahanagar) December 18, 2018
कल्याण पूर्वमधील नागरिकांनी हे गाजराचे तोरण लावून ‘जागो फडणवीस, मोदी सरकार’, अशी घोषणाबाजीही केली. गाजराचे तोरण, हे भारताच्या प्रधान सेवकाचं लक्ष वेधण्यासाठी असून, आम्ही जे केलं ते योग्यच केलं अशी भूमिका यावेळी लोकांनी घेतली. कल्याण पूर्वमध्ये आज पाणी, रस्ते, बांधकामाशी निगडीत अनेक समस्या स्थानिकांना भेडसावत आहेत.
उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान बोलतेवेळी, ‘येत्या काही वर्षांमध्ये मुंबईचा देखील अजून विस्तार होणार आहे. त्यासाठी आम्ही इथल्या सोयी सुविधांकडे लक्ष दिलं आहे,’ असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी मोदी म्हणाले री, २०२२ मध्ये एकट्या मुंबईत तब्बल २७५ किलोमीटरची मेट्रो सुरू होईल. या मेट्रोमुळे पूर्ण मुंबईतल्या ट्रॅफिकच्या समस्येवर उपाय शोधला जाईल. ‘२०३५ सालचं लक्ष्य ठेऊन हे प्रकल्प केले जात आहेत’, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.