घरमुंबईलता मंगेशकर संगीत महाविद्यालयाला काहीही कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ...

लता मंगेशकर संगीत महाविद्यालयाला काहीही कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

मंगेशकर कुटुंबीयांनी खऱ्या अर्थाने संगीत क्षेत्राची फार मोठी सेवा केली. महाराष्ट्राच नव्हे तर भारताचे कला - सांस्कृतिक क्षेत्र समृद्ध केले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ज्या ज्या वेळास महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचा खजिना उघडून पाहू, त्या त्या वेळेस लतादीदींचा आवाज पुढच्या पिढ्यांना संमोहित करेल. महाराष्ट्राच्या मातीने जगाला हे अलौकिक असे रत्न दिले, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे आपल्या भाषणात म्हणाले.

मुंबईः  भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी काहीही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लतादीदी आपल्यात प्रत्यक्ष नसल्या तरी त्यांचा आवाज काल, आज आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत, तोपर्यंत अजरामर राहील. त्यांच्या आठवणी शिवाय कुणाचा एक क्षण जात नाही. असा कुठला व्यक्ती किंवा असे कोणतेही क्षेत्र नसेल जिथे लतादीदींचा आवाज पोहोचला नसेल. जगात किती उलथापालथ झाली तरी सीमा-प्रांत-भाषा आणि देश असे कुठलेही भेद न ठेवता लतादीदींचा रसिक वर्ग कायम राहणार आहेत.

- Advertisement -

मंगेशकर कुटुंबीयांनी खऱ्या अर्थाने संगीत क्षेत्राची फार मोठी सेवा केली. महाराष्ट्राच नव्हे तर भारताचे कला – सांस्कृतिक क्षेत्र समृद्ध केले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ज्या ज्या वेळास महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचा खजिना उघडून पाहू, त्या त्या वेळेस लतादीदींचा आवाज पुढच्या पिढ्यांना संमोहित करेल. महाराष्ट्राच्या मातीने जगाला हे अलौकिक असे रत्न दिले, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे आपल्या भाषणात म्हणाले.

मीरा-भाईंदर येथेही भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाची देखील उभारणी करण्यात आली आहे. एक हजार आसनक्षमता असलेल्या या नाट्यगृहाचे लवकरच लोकार्पण केले जाईल, असेही मुख्यमंत्री यांनी जाहीर केले.

- Advertisement -

ज्येष्ठ अभिनेत्री, माजी खासदार हेमा मालिनी यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला लतादीदींनी गायलेल्या गाण्यावर अभिनय करण्याची संधी मिळाली. माझ्या शंभरहून अधिक गाण्यांना लतादीदींचा आवाज प्राप्त झाला आहे. लतादीदी या सरस्वतीच्या वरदान होत्या. त्यांचा आवाज जेवढा भव्य होता, तेवढेच त्यांचे व्यक्तिमत्व भव्यदिव्य होते.

अभिनेत्री काजोल यांनी हा सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. काजोल म्हणाल्या की, मी जेव्हा लतादीदींना भेटायचे तेव्हा त्यांची बोलण्यातली नम्रता, त्यांच्या स्वभावातली शालिनता मला प्रभावित करायची. त्यांचा आवाज त्यांच्यासारखाच प्रतिभाशाली होता. त्यांचा स्वर अजरामर राहील. यावेळी अभिनेत्री राखी, आशा पारेख, मौसमी चटर्जी, पद्ममीनी कोल्हापूरे, नितू सिंग, बिंदू, रिना राँय, पुनम ढिल्लो, राणी मुखर्जी आदि उपस्थित होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -