घरमुंबईलवकरच मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल!

लवकरच मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल!

Subscribe

मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास दुसर्‍या काळातील मोदी सरकारचा हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असेल. फेरबदलासाठी एकूण २३ खाते निवडण्यात आल्याचे समजते.

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची चर्चा रंगू लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेला पराभव आणि आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल होणार असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक केली. त्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा रंगू लागल्या. विशेष म्हणजे मोदींनी काही मंत्र्यांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली असून त्यांच्या कामकाजाचा आढावाही घेतला.

मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास दुसर्‍या काळातील मोदी सरकारचा हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असेल. फेरबदलासाठी एकूण २३ खाते निवडण्यात आल्याचे समजते. या खात्याच्या मंत्र्यांच्या कामाची स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौकशी केली. पंतप्रधानांनी आतापर्यंत धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंह तोमर, गजेंद्र सिंह शेखावत, महेंद्र नाथ पांडेय, हरदीप पुरी आदी मंत्र्यांशी संवाद साधून त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे. तसेच इतरही काही मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सध्या काही मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त पदाचा भार आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे वाणिज्य, रेल्वे मंत्रालयाव्यतिरिक्त उपभोक्ता मंत्रालयाचा कारभार आहे. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरणासह अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी असून कृषी, पंचायती राज, ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे अन्न प्रक्रियेचा अतिरिक्त कार्यभार आहे. याशिवाय आयुष मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे आहे. गेल्या एक वर्षापासून कोरोनामुळे कॅबिनेटच्या विस्ताराची परिस्थिती निर्माण होऊ शकली नाही. मात्र, मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या २१ कॅबिनेट आणि ९ स्वतंत्र प्रभारी राज्यमंत्री आणि २९ राज्यमंत्री आहेत.

- Advertisement -

फेरबदलात शिंदे, सोनोवाल यांना संधी

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाच्या फेरबदलात आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी, खासदार ज्योतिरादित्य शिंदे, बैजयंत पांडा यांच्या नावांची चर्चा आहे. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयू आणि अपना दलला प्रतिनिधीत्व देण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -