घरमुंबईमान्सूनने महाराष्ट्र व्यापला! - पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात मुसळधार

मान्सूनने महाराष्ट्र व्यापला! – पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात मुसळधार

Subscribe

मुंबईकरांवरचे पावसाचे सावट कमी झाले नाही. पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वार्‍यांनी वेग पकडला आहे. कालपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून पुढे वाटचाल केली. दरम्यान मागील आठवड्यापासूनच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये मान्सूनने दिमाखात आगमन करत मुंबईकरांची पुरती तारांबळ उडवली आहे. असे असले तरी अद्याप मुंबईकरांवरचे पावसाचे सावट कमी झाले नाही. पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शुक्रवारपासून पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, आणि कोकणपट्ट्यात पावसाचा जोर अधिक असेल, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमधून दिली आहे. तर पुण्यात शुक्रवारचा दिवस वगळता पुढील चार दिवस अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा यावर्षीचा सर्वात मोठा सलग पाऊस असणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

शुक्रवारपासून रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर घाटावरील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाला सज्ज राहण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठवाड्यात नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात पुढील आजपासून चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -