घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023मुंबईत फॅमिली फिजिशियनचा तुटवडा; आमदार आशिष शेलारांची विधानसभेत माहिती

मुंबईत फॅमिली फिजिशियनचा तुटवडा; आमदार आशिष शेलारांची विधानसभेत माहिती

Subscribe

 

मुंबईः मुंबईची लोकसंख्या सुमारे २ कोटी असताना एमबीबीएससाठी स्थानिक विद्यार्थ्यांना केवळ १०० जागा उपलब्ध होतात, पर्यायाने मुंबईत लोकसंख्येच्या प्रमाणात फॅमिली फिजिशियन उपलब्ध होत नाहीत, याकडे भाजपा आमदार  आशिष शेलार यांनी विधानसभेत शुक्रवारी लक्ष वेधले.

- Advertisement -

विधानसभेत अर्थसंकल्पाची शुक्रवारी खातेनिहाय चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होताना आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील एका गंभीर विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईत जनरल फिजिशियनची संख्या अपूरी आहे. संस्थेने शोधले आहे त्यानुसार मुंबईतील एकुण 700 एमबीबीएस जागेपैकी 600 जागा गुणवत्तेनुसार तर केवळ 100 जागा स्थानिक विद्यार्थ्यांना मिळतात. त्यातील 60 विद्यार्थीच मुंबईत प्रत्यक्ष वैद्यकीय सेवा देतात.

नवी दिल्लीची लोकसंख्या अडीच कोटी असताना स्थानिक विद्यार्थ्यांना 800 जागा मिळतात,चेन्नईची लोकसंख्या 1 कोटी जागा 300, कलकत्ता दिड कोटी जागा 400 तर मुंबईची लोकसंख्या अडीच कोटी असतना केवळ 100 जागा उपलब्ध होतात. त्यामुळे त्याचे परिणाम आरोग्य सेवेवर होतात, गुणवत्ता हा निकष असायलाच हवा, संपूर्ण देशातील विद्यार्थी कुठेही शिकू शकतो पण याबाबत मुंबईत असलेली विषमता दूर करण्यासाठी सरकारने लक्ष देण्याची गरज आहे, अशी विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. याचवेळी अन्न पुरवठा विभागावर बोलताना त्यांनी मुंबईत रेशनिंग दुकाने कमी होत असून भाडे परवडत नाही म्हणून दुकाने कमी होत आहेत त्यामुळे सरकारने रेशनिंग दुकानांना भाडे वाढवून द्यावे, तसेच वस्तीमध्ये फिरती रेशनिंग दुकाने सुरु करण्यात यावी, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली.

- Advertisement -

दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासोबतही आशिष शेलार यांची खडाजंगी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या ४०० किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामात तब्बल ६ कोटींचा घोटाळा झाल्याचा वारंवार आरोप करत आहेत. हाच मुद्दा आता विधानसभेत सुद्धा उपस्थित करण्यात आला. ज्यामुळे आदित्य ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये सभागृहात जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला. आदित्य ठाकरे यांनी रस्त्यांच्या कामामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर आशिष शेलार यांनी सुद्धा गेल्या २५ वर्षांतील रस्त्यांच्या कामांबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सभागृहात केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -