घरमुंबईलोकल प्रवासासाठी मुंबईकर नियमभंग करेल; केशव उपाध्ये यांचा इशारा

लोकल प्रवासासाठी मुंबईकर नियमभंग करेल; केशव उपाध्ये यांचा इशारा

Subscribe

मुंबईतील सामान्य नोकरदार, कष्टकऱ्यांना उपनगरी प्रवासाची परवानगी न देणाऱ्या ठाकरे सरकारला धडा शिकविण्यासाठी सामान्य मुंबईकर २ ऑगस्टपासून सविनय नियमभंग करीत लोकल प्रवास सुरु करतील, असा इशारा भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी दिला.

मुंबईतील प्रवासाच्या सुविधेबाबत ठाकरे सरकारकडे धोरण नसल्याने सामान्य माणसाचे अतोनात हाल होत आहेत. सामान्य माणसाला उपनगरी प्रवासास परवानगी देण्यास हरकत नसल्याचे केंद्र सरकारने दोन आठवड्यांपूर्वीच स्पष्ट केले आहे. असे असताना राज्य सरकार सामान्य माणसाला उपनगरी रेल्वे प्रवासास परवानगी देण्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

- Advertisement -

महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनेच न्यायालयात दिले असल्याने आघाडी सरकारचा खोटेपणा पुन्हा उघड झाला आहे. केंद्र सरकार ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा करत नसल्याचे आरोप मुख्यमंत्री आणि आघाडी सरकारमधील काही मंत्री करत होते. आता न्यायालयात दिलेल्या शपथपत्रामुळे या सरकारने आपल्या खोटेपणाची कबुली दिल्याचेही उपाध्ये यांनी सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याच्या केलेल्या आरोपांबाबत काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेत असलेल्या आघाडी सरकारने अजून स्पष्टीकरण दिलेले नाही. राज्य सरकारने पटोले यांच्या आरोपांबाबत तातडीने खुलासा करावा आणि त्यांच्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणीही केशव उपाध्ये यांनी केली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -